मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. तटकरे-पटेल यांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षात अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे.
सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार Saam Tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी आयोगाकडे केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कुणाकडून आयोगाकडे पत्र गेले असेल, तर ते आता वैध धरू नये, असे सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवले आहे.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची माहिती या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिली आहेच; शिवाय २८ जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सुनेत्रा पवार
Pune : मोठी बातमी! पुण्याला मिळाला ४ पदरी उन्नत महामार्ग, तळेगाव-चाकणची वाहतूककोंडी कायमची संपणार

अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे-पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर लगेच आता सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते तटकरे आणि पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय का? अशी चर्चा सुरू झाली आहे. "२८ जानेवारी २०२६ नंतर झालेला पत्रव्यवहार पक्षाकडून झालेला असेल तर तो वैध धरू नये. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यापुढे मी जो पत्रव्यवहार करेन तोच वैध धरावा," अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी केली आहे.

सुनेत्रा पवार
New Rule : मोदी सरकारचा मोठा निर्णय, PNG कनेक्शन असेल तर LPG गॅस सिलिंडर बंद

सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे तटकरे-पटेल यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मंगळवारी 'देवगिरी' निवासस्थानावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते; त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आयोगाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यावर अद्याप तटकरे किंवा पटेल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सुनेत्रा पवार
Kharat Case : जयंत पाटलांनी रक्ताने अंघोळ केली, नरबळी दिला का? भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com