सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यसरकारच्या मृद व जलसंधारण विभागातील गट बी संवर्गातील ६५० जागांसाठी फेर परिक्षा घेतली जाणार आहे. ही परिक्षा याआधी घेण्यात आली होती. मात्र, अमरावतीमधील परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
जुलै महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी, या अनुशंगने ७ शहरातील १० टिलीएस-आयओएन कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच घेतली जाणार आहे. TCS च्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथील केंद्रावर १४, १५, १६ जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात मृद व जलसंधारण विभागातील गट बी संवर्गातील ६५० पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र अमरावती शहरातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावतीच्या परिक्षा केंद्रावर गैरप्रकार झालेल्या घटनेची गंभीर दखल घेतली होती. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने ही परीक्षा पारदर्शक होण्यासाठी TCS कंपनीच्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता फेरपरिक्षा घेतल्याने पात्र उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.