
बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबरला खून झाल्याची घटना घडली होती. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड यांचा सहभाग असल्याचं आरोप होत आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड फरार होता. आज वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला.
यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नवा दावा केल्याने वेगळाचं संशय येऊ लागलाय. कराड याची अटक हे सरकारचं नाटक असल्याचा संशय भास्कर जाधव यांनी व्यक्त केलाय. वाल्मीक कराड याच्या आत्मसमर्पणापूर्वी काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे यासर्व घडामोडीवर वेगळ्याच संशयाची सुई फिरत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनाही हे नाटक वाटत आहे.
संभाजी राजे छत्रपती यांनीही या घटनेवर संशय व्यक्त केलाय. ठाकरे गटाचे नेते यांनीही हे नाटक असल्याचं म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा कर्ता करविता आहे. हत्येची घटना घडल्यापासून फरार झालेला कराड पोलिसांची हाती लागत नाही. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार केली होती. तरीही कराडला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं.
आज तो स्वत:हून सीआयडीच्या कार्यालयात येतो हे यावरून पोलीस यंत्रणेवर संशय येतो शिवाय शरण आल्याच्या घटनेवर संशय येण्यास वाव असल्याचं भास्कर जाधव म्हणालेत. भास्कर जाधव यांचा दावा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा झाली. काल त्यांनी दीर्घ काळ चर्चा केली, असं आपण वृत्तपत्रात वाचलं. त्यानंतर आज वाल्मीक कराड शरण आला. हा योगायोग म्हणावा की, पोलिसांच्या हाती न लागताच तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का? अशी शंका जनतेच्या मनात येतेय आहे. यातून महाराष्ट्राची जनता नक्कीच योग्य तो बोध घेईल, असं भास्कर जाधव म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.