
माणिकराव कोकोटे यांच्यानंतर संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य
शिरसाटांच्या वक्तव्याने नवा वाद
अकोल्यातील कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य
अक्षय गवळी, साम टीव्ही
अकोला : मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबत नाहीयेत. आता परत नव्याने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागं लागण्याची चिन्ह आहेत.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एक विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'सामाजिक न्यायभवनाच्या वस्तीगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी' अशा कितीही रक्कम मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे... आपल्या बापाचं काय जातंय" असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलंय. यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते.
अकोल्यातील याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाट यांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला. मिटकरी तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतो. मात्र, तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिलाय.
राज ठाकरेंनी कुणाच्या व्यासपीठावर जावं आणि काय बोलावं?, यावर आपण काही बोलू शकत नसल्याचं मंत्री संजय शिरसाठ म्हटलेय. तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुरावे देण्यापूर्वी 2029 ची निवडणूक झालेली असेल असं ते म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.