ऐकलतं... हे आहेत.. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्य़ा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप...त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे पक्षानं त्यांना नोटीस पाठवली.. मात्र तरीही जगतापांची वक्तव्य सुरुच आहेत...
जगतापांनी मुस्लिम धर्मियांवर केलेल्या या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना तातडीनं मुंबईत बोलवून घेतलं.....त्यामुळे बीडची हिंदुत्ववादी संघटनांची सभा रद्द करून जगताप थेट मुंबईकडे रवाना झाले... याचं वरळीतील पक्षाच्या बैठकीनंतर अजित पवारांनी संग्राम जगताप यांना समज दिल्याचीही चर्चा आहे...
मुळात संग्राम जगतापांच्या वादग्रस्त विधानानंतर अजित पवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती...तरीही जगतापांनी पक्षाच्या विचारधारेपासून फरकत घेत, आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका मांडली.. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरील भुजबळाच्या भूमिकेनंतर ही अजित पवारांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती...
काही नेते विशिष्ट जातीबद्दल टोकाची भूमिका घेतात.. त्यामुळं या नेत्यांचं मत हे पक्षाचं मत असल्याची चुकीची प्रतिमा बनते... त्याची पक्षाला किंमत मोजावी लागते.अशा शब्दांत अजित पवारांनी नेत्यांना सुनावलं होतं....
दुसरीकडे संग्राम जगताप वारंवार हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यानं 2029ला ते अजित पवारांच्या पक्षांतून नव्हे तर भाजपमधून लढतील, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय...
संग्राम जगतापांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे आता पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय... त्यातच पक्षातील या नेत्यांमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढतेय.. आता पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्या या नेत्यांवर अजित पवार काय कारवाई करणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.