Maharashtra Politics : अजित पवार गटासोबत जाणार का? रोहित पाटील स्पष्टच बोलले,VIDEO

Ajit pawar vs Sharad Pawar : अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींवर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit patil
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

पंढरपूर : लोकसभेत शरद पवार गटाला मोठं यश मिळालं. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार बाजी मारली. लोकसभा निवडणुकीचं वारं विधानसभा निवडणुकीत बदलून गेलं. त्यामुळे महायुती सत्तास्थानावर पोहोचली. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या ७ ते ८ खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याच घडामोडीवर तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'पक्ष आणि शरद पवार भूमिका घ्यायला लावतील, आम्ही ती भूमिका या पुढच्या काळात घेऊ, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी केलं आहे. आमदार रोहित पाटील यांच्या या विधानामुळे शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट एकत्र येण्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.

Rohit patil
Rohit Pawar: ...तर आम्ही राजीनामा देऊ; आमदार रोहित पवार आक्रमक, EVM वरून राजकारण तापलं!

मागील काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. त्यातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाकडून खासदारांना फोन येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आज शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आमदार रोहित पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पक्ष आणि शरद पवार भूमिका घ्यायला लावतील, ती भूमिका या पुढच्या काळात घेऊ, असे मोठे विधान केले आहे. रोहित पाटील यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Rohit patil
Maharashtra Politics News: नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?; सांगितला तो किस्सा

दरम्यान, शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांना अशा पद्धतीचे कोणतेही फोन आले नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना फोन येणे, अशा कुठल्याही बातम्या तथ्य नाही. आमदार आणि खासदारांना अशा कुठल्याही प्रकारचे फोन आले नाहीत. याबाबत मी ऐकलेही नाही. खासदारांना फोन येणे ही कदाचित मीडिया ट्रायल असू शकते. असे विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर आर पाटील यांनी पंढरपुरात केले.

'राज्यात मसाजोग प्रकरणानंतर गृहखातं आर आर आबा यांनी घालून दिलेला आदर्श विसरला आहे. आर आर आबांनी संतांच्या महापुरुषांच्या विचाराच्या कृतीतून गृहखातं चालवलं होतं. आता तसे दिसत नाही, असे म्हणत आमदार रोहित पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

'मला कोणाचाही फोन आला नाही'

अजित पवार गटाकडून संपर्क केल्याच्या चर्चांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रतिक्रिया दिली आहे. 'मला कोणाचाही फोन आलेला नाही, असे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com