
भाजपचे खासदार निशिकांत दूबे हे काही पहिले राजकारणी नाही ज्यांनी ... जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठीचा जागर होतो तेव्हा तेव्हा मराठी द्वेष्ट्यांनी डोळे वटारत महाराष्ट्राकडे पाहील्याचं आतापर्यंत अनेकदा दिसून आलंय .... महाराष्ट्रात रोजी रोटी कमवायची , आणि त्याच परप्रांतियांनी कायम मराठीला आणि इथल्या मराठी माणसाला गृहित धरायचं . आतापर्यंत मराठीचा द्वेष करत प्रसिध्दचं राजकारण करण्याचा प्रयत्न नेहमीच झालाय ... आता तर बिहार निवडणूक तोंडावर आहे म्हणजे .. भाषेच्या राजकारणाचा वापर होणारचं
लालू प्रसाद यादव, मा. मुख्यमंत्री बिहार
- मुंबईवर केवळ मराठी माणसांचा हक्क नाही, राज ठाकरेंवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई करा
- २००८ ला मराठी माणसांनी महाराष्ट्रातील नोकऱ्या परप्रातिंयांना मिळाल्याविरोधात आंदोलन केल्यानंतर लालूप्रसाद यादवांनी हे वक्तव्य केलं. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. लालू प्रसाद यादव बिहारी माणसाचे छत्र झाले . तेच अमसिंहांनीपण केलं
अमरसिंह, समाजवादी नेते
- मुंबई कुणाच्या बापाची नाही असं वक्तव्य करुन महाराष्ट्रालातील मराठी माणसाला आणि 105 हुतात्मांचा अपमान केला होता.
राम विलास पासवान
- मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ती केवळ मराठी माणसाची नाही. इथे प्रत्येक भारतीयाला राहण्याचा आणि काम करण्याचा हक्क आहे.
- मुंबईतील मराठी माणसांना अक्कल शिकवण्याचा हा प्रयत्न फक्त परप्रांतियांनी केलेला नाही तर मुंबईच्या जिवावर मोठं होणाऱ्या अबू आझमींनी मराठीत आमदारकीची शपथ घेणार नाही म्हणत मराठी माणसाला डिवचलं.
भय्याला दिली ओसरी ... भय्या हात पाय परसी ही मराठीतली म्हण आजही जशीच्या तशी लागू होते ... परप्रातीयांना विरोध नाही देश म्हणून एक आहोतचं मात्र म्हणून दुस-याच्या घरात दादागिरी करण्याचा अधिकार मात्र या परप्रतियांना कोणी दिला ... महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी मतांच्या काही तुकड्यांसाठी महाराष्ट्राची अस्मिता वेशीवर टांगू नये ....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.