ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे - राणेंचा घणाघात

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून वादळे, महामारी, पूर अशी संकटे येत आहेत
ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे - राणेंचा घणाघात
ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे - राणेंचा घणाघातsaam tv news
Published On

कोरोनासह (Corona virus) राज्यातील नैसर्गिक आपत्तीला (Natural disasters) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जबाबदार असल्याच बेताल वक्तव्य भाजपा नेते आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पूराचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांनी चिपळून दौरा केला. यानंतर त्यांनी तेथील नागरिकांना मदतीचे आश्वासनही दिले. तर दुसरीकडे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी तळीये गावाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Narayan Rane Criticized on CM Uddhav Thackeray)

ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे - राणेंचा घणाघात
मुंबई महानगरपालिकेच्या 2 तुकड्या रायगड कोल्हापूरकडे मदतीसाठी रवाना

राज्यात ठाकरे सरकार आले आणि येताना कोरोना घेऊन आले. ठाकरे सरकार कोरोना महामारीला जबाबदार आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून वादळे, महामारी, पूर अशी संकटे येत आहेत. ठाकरे सरकार या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. इतकेच नव्हे तर, ठाकरे सरकार पांढऱ्या पायाचे आहे, अशी घणाघाती टिकाही यावेळी नारायण राणे यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी, आपण राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे देखील म्हटले.

दरम्यान, देवेंद्र फड़णवीस, नारायण राणे आणि प्रविण दरेकर यांनी आजच्या दौऱ्यात तळीये गावाची पाहणी केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला येथे पाठवले असून आपत्तीग्रस्त भागातील जनतेच्या समस्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत केवळ 44 मृतदेह सापडले असून अद्याप मृतदेह सापडले हाती लागलेल नाहीत. पुनर्वसन काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरेबर, पीडितांना न्याय देण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सकारात्मक आहे. तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही यावेळी नारायण राणे यांनी दिले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com