सागर निकवाडे
नंदूरबार : मार्च महिन्यात राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यभरातील (farmer) शेतकऱ्यांना दिलासा असताना, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात कांद्यासाठी अधिकृत बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. (Latest Marathi News)
रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक होत असते. परंतु अधिकृत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती, परवानाधारक अथवा नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खरीप आणि रब्बी हंगामात लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटलमागे अनुदान मिळत आहे.
खरेदी केंद्र सुरू करा
नंदुरबार जिल्ह्यात कांद्याची आवक अधिक आहे. मात्र नंदुरबारात (Onion) कांदा खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे कांद्यासाठी अधिकृत खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी आता नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी करू लागले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.