सागर निकवाडे, प्रतिनिधी
Nandurbar News: नंदुरबार जिल्हा रुग्णालय मधील अपूर्ण साधनसामग्री आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बालमृत्यूंचे धक्कादायक चित्र समोर आले असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून 70% लोकसंख्या हे आदिवासींची आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा सलाईनवर असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैकी 23 हजार बालके ही नंदुरबार जिल्ह्यातील आहेत.
जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्न गंभीर असून मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची कॅपॅसिटी असताना 84 बालक उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचा प्रमाण वाढला असल्याचेही पाडवी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.