Maharashtra Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSaam Tv

नांदेडकरांचे स्वप्न सत्यात उतरले, २४ तासात वंदे भारत धावणार, वाचा A टू Z माहिती

Nanded-Mumbai Vande Bharat Express : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडहून मुंबईपर्यंतचा प्रवास ९ तास २५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या गाडीत २० डब्बे असून, एकूण १४४० आसन क्षमता आहे.
Published on
Summary
  • नांदेडकरांचे स्वप्न सत्यात, मुंबई-वंदे भारत एक्सप्रेस धावणार.

  • ६१० किमी अंतर ९ तास २५ मिनिटांत पूर्ण होणार.

  • आठवड्यातून सहा दिवस धावणार, २० डब्ब्यांची सुविधा.

  • परभणी, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, दादर या प्रमुख स्थानकांवर थांबे.

Nanded to Mumbai in Just 9 Hours via Vande Bharat Express : नांदेडकरांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. मंगळवारी नांदेडहून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. मुंबई-जालना वंदे भारतचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी नांदेड-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहे. यावेळी नांदेडचे भाजप खासदार अशोक चव्हाण, पदाधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेडकरांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. लोक प्रतिनिधींकडूनही वंदे भारतच्या मागणीचा जोर होता. त्याला रेल्वेकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला. जालना-मुंबई ही वंदे भारत एक्स्प्रेस पुढे नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला. नांदेड-मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस आता ६१० किलोमीटरचे अंतर फक्त ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करणार आहे.

Maharashtra Vande Bharat Express
Accident : भयंकर अपघात! ट्रॅक्टर-कंटेरनची भीषण धडक, ८ जणांचा मृत्यू, ४३ जखमी

नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. या रेल्वेला २० डब्बे असतील. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह २ आणि १८ चेअर कार डब्बे असतील. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एकूण १४४० आसन क्षमता आहे. मंगळवारी ही रेल्वे नांदेडमधून सकाळी ११.२० वाजता सुटून रात्री ९.५५ ला मुंबई सीएसएमटी स्थानकात पोचेल.

Maharashtra Vande Bharat Express
Maharashtra politics : शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद? मुख्यमंत्र्यांचे नगरविकास खात्याच्या कारभारावर ताशेरे

नांदेडहून मुंबई सीएसएमटीला दररोज सकाळी ५:०० वाजता वंदे भारत सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. मुंबई सीएसएमटीहून दुपारी १:१० वाजता सुटेल आणि रात्री १०:५० वाजता नांदेडला पोहोचेल. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस चालेल. या प्रवासादरम्यान, ही ट्रेन परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

Maharashtra Vande Bharat Express
Manoj Jarange : चलो मुंबई! आंदोलनापूर्वी मनोज जरांगेंची पत्रकार परिषद, नेमका काय निर्णय घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com