
तन्मय टिल्लू
मुंबई : मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाढणारे तापमान आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आता नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे उकाडा आणि प्रदूषणाला नैसर्गिकरीत्या प्रतिबंध घालता येणार आहे. पालिकेनं काय प्रस्ताव पाठवलाय पाहूया.
गेल्या काही वर्षांपासून वाढणारं तापमान आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आता नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे वाढता उकाडा आणि प्रदूषणाला नैसर्गिकरीत्या प्रतिबंध घालता येईल. नव्या इमारतींना परवानगी देताना ही अट अर्जामध्ये समाविष्ट केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे पाठवलाय. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि हिरवळ वाढवण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत पाहूया.
नवीन इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक
वाढणारे तापमान, प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचा निर्णय
टेरेस गार्डन तयार करण्याची अट घातली जाईल
जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार
बांधकाम मजबूत असल्यास टेरेसवर गार्डन उभारता येणार
इमारतींच्या आवारात 5% जागा मियावाकी वनांसाठी राखीव
मुंबईला हिरवंगार करण्यासाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मियावाकी वनं,टेरेस गार्डन तयार करण्यात येत आहेत. इमारतींच्या आवारात किमान 5 टक्के जागा मियावाकी वनांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आलंय..मात्र विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीकडेही पालिकेनं गांभीर्यानं लक्ष दिलं तरी मुंबईतील हिरवळ वाढण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.