
तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धुम पाहायला मिळतेय. धुळवडी नंतर शिमग्याचा उत्साह तर शिगेला पोचला आहे. सिंधुदुर्गात गावागावातील काही हौशी मंडळे घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत खेळ करतात तर काही ठीकाणी राधा कृष्ण नाचवले जातात. कृष्ण, राधा, ब्राह्मराक्षस, हनुमान, अशी आकर्षक वेशभूषा करून नाचे पौराणिक गाण्यावंर नाचत निखळ मनोरंजन करतात. प्रत्येक घराच्या अंगणात हे नाचे पौराणिक वेशभुषेत नाच करतात. हे खेळ पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात. पाहूयात सिंधुदुर्गात कशा प्रकारे खेळला जातो नाच्यांचा खेळ.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात आज देहू नगरीत संपन्न होणार आहे. बारा वाजता नांदूरकीच्या झाडावर भाविक आपल्या हातातील पुष्प अर्पण करून हा सोहळा साजरा करणार आहे. या बीज सूर्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल झालेले आहे. मंदिर देवस्थान आणि नगरपंचायतीच्या वतीने जयत तयारी करण्यात आलेली आहे.
नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय यांनी सुनावणीदरम्यान नाशिक महानगरपालिका यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत चांगलेच झापले आहे. या प्रकरणात महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बुधवारीही मनपा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. दरम्यान, मनपाने हरित लवादात सुरू असलेले प्रकरण प्रथम उच्च न्यायालयात चालवावे, असा युक्तिवाद केला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत प्रकरण हस्तांतरित करण्यास नकार दिला आहे. तपोवन परिसरातील कथित बेकायदेशीर वृक्षतोड थांबवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरातील वृक्षतोडीवर स्थगिती देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार असून, त्या दिवशी प्रतिज्ञापत्र सादर न झाल्यास मनपावर कठोर आदेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसटीची शिवनेरी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार
ऐन उन्हाळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यात प्रवाशांना करता येणार ए सी मधून प्रवास
नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त २०० व्होल्व्हो बसेसची खरेदी प्रक्रिया
मुंबई पुणे अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवाशासाठी शिवनेरी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळालेल्यानंतर आता मुंबईपाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानूकुलित प्रवास सुरू होणार आहे
पुणे शहरासह जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत
नागरिकांनी घाबरून न जाण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशन चे आवाहन
पुणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नेहमीच सुरू असून सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही अशी माहिती पेट्रोल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे
समाज माध्यमांवर पेट्रोल साठा संपत असल्याचे अफवा पसरल्या जात आहेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये किंवा ज्यादा इंधन खरेदी करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे
पुण्यात दोन तास रिक्षा संघटना आणि प्रवासी मालवाहतूक संघटना च्या आंदोलनामुळे वाहतूक बंद असणार
ई चलनाविरुद्ध पुण्यात आज रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीचे निदर्शने
आंदोलनादरम्यान दोन तास रिक्षा आणि महार प्रवासी मालवाहतूक बंद असणार
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने होणार पोलिसांच्या ई-चलना विरुद्ध निदर्शने
घटनाबाह्य व बेकायदेशीर जबरदस्तीची वसुली बंद करण्याचा मागणीसाठी निदर्शने
११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेचे आंदोलन
दुबई, अबू धाबी मधून 111 प्रवासी पुण्यात परतल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
198 नागरिकांपैकी 111 नागरिकांना पुण्यात सुखरूप आणण्यात आले आहे
19 नागरिकांच्या विमान उड्डानाची वेळ बदलल्याने 54 नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे
दुबईत गेलेल्या प्रवाशांचे नातेवाईक संपर्क करत असून प्रवाशांची संख्या वाढत असल्याची माहिती
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात अनैतिक संबंधातून एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील 22 वर्षीय दुर्गेश्वर ठाकूर याचे थडीसावळी येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मयत दुर्गेश्वर ठाकूर याचे चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतीक सबंध होते.त्यांच्या संबंधाची माहिती महिलेच्या कुटुंबीयांना मिळाली.महीलेच्या नातेवाईकानी दुर्गेश्वर ठाकुर याला गावात बोलावून घेतले. आले.आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस ? असा जाब विचारत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या गुप्तांगावर लाथा मारण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.त्यानंतर त्याला उलट्या होऊन जागीच मृत्यू झाला.अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी गावातील तीन आणि तेलंगणातील चार अश्या सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.
विद्यासाधना शिक्षण संस्थेचा संचालकच मुख्य सूत्रधार असल्याचा तपासात निष्कर्ष
संदीप बाबुराव सरटकर (वय ५४) अस आरोपीचे नाव आहे..
खासगी शिकवणी संचालकाला पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती..
पोलिसांकडून गेल्या शुक्रवारी अटक, मोबाईलमधील डाटा डिलीट केला होता, मात्र सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन तपास सुरू
आणखी किती जणांना पेपर पुरवले? आर्थिक व्यवहारांची चौकशी
१८ फेब्रुवारीला सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना प्रकार उघड
विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील 20 जण आखाती देशात अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील 17 जण नोकरीनिमित्त सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सध्या मध्यपूर्वेतील युद्ध जन्य परिस्थितीमुळे ते मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाचा त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उरण तालुक्यातील कविश घरत आणि प्रांजली घरत हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले असून ते हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर पाली येथील उत्कर्ष मापारा शिक्षणासाठी दुबईत गेला आहे. तो देखील सुरक्षित असून कुटुंबियांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कर्जत तालुक्यातील तुंगी गाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तीन गोवंशीय जनावरांचा खात्मा केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी हनुमान शिवाजी सुपे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सुपे यांच्या मालकीची दुभती जनावरे गोठ्यात बांधलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास हिंस्र प्राण्याने हल्ला केला. गोठ्याच्या खिडकीतून उडी मारून आत प्रवेश करत जनावरे फस्त केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ४ मार्च रोजी मध्यरात्री घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात काल वणव्यामुळे आग लागली होती. राजमात वाड्यात लागलेल्या या वणव्यामुळे ऐतिहासिक वास्तुंबाबत पुरातत्व विभागाची बेफिकीरी समोर आली असून याबाबत स्थानिक नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंचा राजवाड्याचे भग्नावस्थेतील अवशेष आहेत. राजमातांचे सर्वाधिक काळ वास्तव्य या वाड्यात होते तर याच वाड्यात राजमातांची अखेरचा श्वास घेतला या मुळे हा ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. हा वाडा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून केला जात आहे.
महाड शहरातील प्रांत कार्यालयाजवळील विद्युत ट्रान्सफॉर्मरला काल सायंकाळी अचानक आग लागली. मोठा आवाज करीत ट्रान्सफॉमर पेटल्याने परिसरात घबराट पसरली. ट्रान्सफॉमर शेजारील उंबराच्या झाडाच्या फांद्या घातल्याने ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याची शक्यता होत आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल असल्याने आग वेगाने भडकली. महाड नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत फोमचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, दरम्यान काहीकाळ महाड शहरातील विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता तर परिसरातील गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
जालना महानगरपालिकेत काँग्रेसकडून चक्क भाजपच्या पराभूत उमेदवाराला स्वीकृत नगरसेवकांसाठी अर्ज मिळाला आहे. जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यावरून काँग्रेस मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.जालना जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या गटनेते आमने-सामने आले आहेत. भाजपकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या विनोद रत्नपारखे यांनाकाँग्रेसने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याने जालनाच्या राजकारणात खळबळ उडालीय.दरम्यान आमचा गटनेता विकला गेला अशी खंत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी बोलून दाखवली तर जिल्हाध्यक्ष काँग्रेस संपवण्यासाठी निघाल्याचा पलटवार गटनेत्याने केला आहे..
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे रायगड जिल्ह्यातील 20 जण आखाती देशात अडकून पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील 17 जण नोकरीनिमित्त सौदी अरेबिया आणि कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र सध्या मध्यपूर्वेतील युद्ध जन्य परिस्थितीमुळे ते मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाचा त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उरण तालुक्यातील कविश घरत आणि प्रांजली घरत हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले असून ते हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर पाली येथील उत्कर्ष मापारा शिक्षणासाठी दुबईत गेला आहे. तो देखील सुरक्षित असून कुटुंबियांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.