
चिखली येथे झालेल्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“मी कुठल्याही प्रकारे महिलांचा अपमान केलेला नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी मध्य रात्री नांदेड शहरात गँगवार मध्ये तीन गुंडाचा खून झाला.या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरु असताना शनिवारी रात्री शहरात पुन्हा एकाचा खून झाला.
नांदेड शहरातील मुरमुरा गल्ली येथे शनीवारी रात्री उशिरा हे हत्याकांड झाले.
रज्जू उर्फ रंजीतसिंघ तबेलेवाले या 32 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला.तलवारीने वार करुन दोघांनी त्याची हत्या केली.
खरात प्रकरणा प्रमाणेच रायगडच्या खालापुरमध्ये देखील भोंदू बाबाचे प्रकरण समोर आले आहे.
या प्रकरणी सांताक्रूझ मुंबई येथील पिडीत महिलेने खालापुर पोलीस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पिडीत महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने या भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे असून भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.
शहरातील सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना येत्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपयांची ‘लाडकी विद्यार्थिनी शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे
नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन सुवर्ण होण, प्राचीन नाणी अन शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे,छत्रपती शिवरायांचा 'सुवर्ण होन' पाहण्यासाठी किल्ल्यावरती विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था आणि नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवराज्याभिषेकाचा जिवंत साक्षीदार असलेला सुवर्ण होन त्याचबरोबर इस.सनपूर्व 600 वर्षा पासूनची दुर्मिळ नाणी आणि मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवकालीन (प्राचीन)शस्त्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
मेहकर तालुक्यातील साब्रा येथील खाजगी अनाथ आश्रमाची अवस्था अलीकडील वादळामुळे अत्यंत दयनीय झाली आहे. अचानक आलेल्या वादळामुळे आश्रमातील झोपड्या व निवास व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यार्थी उघड्यावर राहण्यास मजबूर झाले असून अन्न, पिण्याचे पाणी व दैनंदिन गरजांच्या वस्तूंची कमतरता भासत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर तसेच शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत पुरवून मुलांसाठी सुरक्षित निवारा, अन्न व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे....
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी आणि तळेगाव ढमढेरे परिसरात दोन वेगवेगळ्या उसाच्या शेतात दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कोंढापुरी येथे शेताला पाणी देताना, तर तळेगाव ढमढेरे येथे ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली.दोन्ही बिबट्यांना शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.दरम्यान, परिसरात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्यांची भटकंती वाढत असल्याचेही समोर येत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
पालघरच्या मनोर हद्दीत मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. जय अंबे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालक दानिश खान (वय ३०) याला हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर ट्रकची चावी हॉटेलमध्येच विसरल्याने तो पुन्हा चावी घेण्यासाठी गेला असता हॉटेल मॅनेजरसोबत त्याचा वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक एकटा असल्याचा फायदा घेत हॉटेलमधील काही जणांनी मिळून त्याला मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर पेट्रोल ओतण्याचाही प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप आहे.या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याला मनोर येथील सह्याद्री खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून याचे पंचनामे देखील केले जात आहेत.
संगमनेर तालुक्यात निमगाव भोजापूर येथे बोगस डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या करणाऱ्यांचा भांडाफोड झालाय.. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये शैलेश किसनराव कडलग आणि प्रविण गंगाधर कवडे यांचा समावेश आहे..
मुंबईतील परळ–प्रभादेवी दरम्यान असलेल्या जुन्या एल्फिन्स्टन रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या कामामुळे अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अर्धवट मार्गावरच चालवण्यात येत आहेत.
या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते दादर दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली असून कुर्ला, ठाणे आणि दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम जाणवत आहे. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
धाराशिवच्या उमरगा शहरातील उपक्रमशील शिक्षक विवेकानंद जाधव यांच्या शिक्षकी पेशात 33 वर्षाच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थिती संपन्न झाला. यावेळी मान्यवर मंडळीनी सेवानिवृत्त शिक्षक विवेकानंद जाधव यांच्या सेवाकाळातील भूमिकेवर प्रकाश टाकताना कृतज्ञता भाव व्यक्त करुन गौरव केला.
कणकवली शहरात चोरट्यांनी दहशत पसरवली आहे. काल रात्री पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी ८ दुकाने फोडली असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या जबरी दुकानफोड्यांमुळे कणकवली शहरात घबराहट पसरली आहे. कणकवली - आचरा रस्त्यावरील बेकरीचे दुकान, मेडिकल, इलेक्ट्रिक दुकान, भुसारी दुकान अशा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून लाखो रूपयांची चोरी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्याच्या शभंर मिटर अंतरावर ही जबरी चोरी झाली असून कणकवली पोलिसांसाठी याचा तपास लावणे आव्हान असणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात नो-पार्किंग झोनमध्ये आटोरिक्षा उभ्या केल्यामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे पोलीस विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तसेच सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शून्य टक्के वसुलीच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी पाठिंबा देत ९५ टक्के कर्जाची परतफेड केली. सोबतच बँकेने चार हजार १५५ कोटींचा ठेवीचा टप्पा पार केला आहे.
यंदा जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये वितरीत केलेल्या पीककजपैिकी तब्बल एक हजार १७ टक्के पीककर्ज रकमेचा भरणा केला कोटी ७६ लाख रूपये अर्थात ९५ असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी माहिती दिली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०८० कोटी ८६ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी विकासोच्या तब्बल १ लाख ६४ हजार ८६५ शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या विविध शाखांच्या माध्यमातून १०८५ कोटी २ लाख रूपये पीककर्जाचे वितरण करण्यात आले होते.
लातूर महापालिकेकडे पाटबंधारे विभागाची 32 कोट्यावधीची पानीपट्टी थकल्याने , लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणारा खंडित करण्यात आलाय, मागच्या 5 दिवसापासून लातूर शहरात पाणीपुरवठा बंद आहे, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे , तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शहरवासीयांकडून होते आहे.
सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई विमानप्रवास सुरु झाल्यानंतर आता सोलापूर हैद्राबाद ही विमानसेवा देखील सुरु होतेय. सोलापूर गोवा विमानसेवा देणाऱ्या Fly 91 या कंपनीद्वारेचं सोलापूर हैद्राबाद विमानसेवा देखील सुरु होतेय. 17 एप्रिल रोजी सोलापूर ते हैद्राबाद विमानसेवा सुरु होणार असून त्यासाठी तिकीट बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. साधारण 3800 रुपये सोलापूर हैद्राबाद विमानसेवेसाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहे. सुरुवातीला आठवड्यातील 5 दिवस ही विमानसेवा सुरु राहिलं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे एकूण 5 दिवस ही विमानसेवा चालेल. दुपारी 3.20 विमान सोलापुराहून हैद्राबादच्या दिशेने निघेल ते 4.25 मिनिटांनी हैद्राबादला पोहोचेल तर 4.50 मिनिटांनी हैद्राबादहून निघणारे विमान 5.50 वाजता सोलापुरात येईल.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात
काल मध्यरात्री घडला भीषण अपघात
भरधाव कार डिव्हायडर आणि सुरक्षा भिंतीला धडकली
अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू
- भररस्त्यात बेदम मारहाण करत पत्नीच्या अंगावर थेट फॉर्च्युनर कार घातली
- पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ
- पत्नीच्या इंस्टाग्राम चॅटवरून पतीचा संताप अनावर, धडकेत पत्नी गंभीर जखमी, नागरिकांनी केली मदत
- पती विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल, सराईत गुन्हेगार पती समीर पठाण नाशिक पोलिसांच्या अटकेत
- नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषेदेला मुख्यमंत्री राहणार उपस्थित
- देश विघातक कारवाया, हिंदू धर्म, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, साधू महंतांच्या अपेक्षा आणि अन्य मुद्द्यांवर संत परिषदेत सुरू आहे मंथन
- देशभरातील साधू महंतांचे प्रमुख आखाडे आणि संप्रदायाचे ३०० हून अधिक महंत तसच प्रतिनिधी परिषदेत सहभागी
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.
२ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET ऑनलाइन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागात "शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते" असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे आणि एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रकारामुळे तमाम शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परीक्षार्थींनी यासंदर्भात आमदार कुल यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली होती.
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेतली प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली
बैठकीत तात्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना
शहरातील पाणी साठणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करत तातडीच्या उपायांसोबतच दीर्घकालीन नियोजनावरही बैठकीत सखोल चर्चा
भविष्यात अतिवृष्टी झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज व्यवस्थेवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची सूचना
लातूरच्या उदगीर शहरातील मुसा नगर गांधीनगर भागात रात्री दोन गटात दगडफेक झाली आहे, अचानक दगडफेक झाल्यामुळे परिसरात भीतीचा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं, दरम्यान दगडफेकीचे कारण अद्याप समोर आले नाही, मात्र पोलिसांनी या भागात मोठा फौज फाटा तैनात केला होता, तर काही तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. रस्त्यावर दगडांचा मोठा खच देखील साचला आहे. तर या घटनेमागचं नेमकं कारण आता पोलिस तपास करत आहेत
भोंदू अशोक खरातचा मुलगा गायब, मुलाचा फोनही नॉट रीचेबल
SIT कडून भोंदू खरातच्या मुलाची २ दिवस चौकशी
मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब, सूत्रांची माहिती
मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य होतं
मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातच्या मुलाने पलायन केल्याची सूत्रांची माहिती
धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.कळंब तालुक्यातील माळकरंजा शिवारात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळीमुळे ज्वारी पिकाच मोठ नुकसान झाल आहे,शेतकऱ्याच्या ज्वारीची शेती भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल झाल आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
मध्य प्रदेश: अनूपपुर जिल्ह्यातील कोतमा येथे एक इमारत कोसळली. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मध्य प्रदेशचे मंत्री दिलीप अहिरवार यांनी सांगितले, "ही अत्यंत दुःखद घटना आहे... मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला आणि आम्हालाही निर्देश दिले आहेत... मी आणि मध्य प्रदेशचे मंत्री दिलीप जायसवाल घटनास्थळी उपस्थित आहोत. संपूर्ण प्रशासन येथे कार्यरत आहे. बचावकार्य सुरू आहे. मलब्यात दबलेल्या सुमारे ५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे आणि उर्वरित ३ जणांचे उपचार सुरू आहेत... घटनेची पूर्ण चौकशी करण्यात येईल..."
#WATCH कोतमा, मध्य प्रदेश: अनूपपुर जिले के कोतमा में एक इमारत ढही। मलबे में फंसे लोगों को बाहर निकालने के लिए बचाव कार्य चल रहा है। pic.twitter.com/ZTShJg0XnU
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2026
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.