नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर विभागाने परीक्षा व्यवस्थेत केला बदल..
सर्व परीक्षा केंद्रावर सीलबंद प्रश्नपत्रिकेचे बॉक्स पेपरच्या वेळेत 11 वाजताच उघडली जाणार..
यापूर्वी विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचनासाठी 10 मिनिटे आधी पेपर दिला जायचा. आता ही पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे..
तसेच उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी 2 वाजता ऐवजी 2 वाजून 10 मिनिटांनी वेळ निश्चित करण्यात आली.
कस्टोडियनकडून केंद्रप्रमुखापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवण्याचा कालावधी आता 10 ते 15 निश्चित करण्यात आला आहे..
भविष्यात पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कडक उपाय सुरू करण्यात आले आहे.
पेपरफूटी प्रकरणानंतर भरारी पथकात वाढ, पूर्वी 6 भरारी पथक तैनात होती. आता वाढवून 8 पथक करण्यात आली आहे...