Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६, राज्यातील २९ महापालिकांचा निकाल जाहीर, भाजपला स्पष्ट बहुमत, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Wardha: वर्ध्यात रन फॉर इनव्हारमेंट 2026 चे आयोजन

वर्ध्यात रन फॉर इनव्हारमेंट 2026 चे आयोजन

4500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा दोन वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा

वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री रणजीत कांबळे, पोलीस अधीक्षकसह मान्यवरांची उपस्थिती

विजेत्यांसाठी विविध बक्षिस

Nagpur: टी 20 मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम रात्री नागपूरात दाखल..

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना नागपूरात खेळला जाणार..

21 जानेवारी रोजी नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियम वर हा सामना खेळवला जाणार..

या सामन्या करिता वरुण चक्रवती, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शिवम दुबे रवी बिश्नोई, रिंकू सिंग, ईशान किशन, आणि संजू सॅमसन रात्री नागपुरात पोहचले...

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

धाराशिव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून,या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकतीने लढवणार असल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप कामाला लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप कार्यालयाकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.पंचायत समितीच्या ११० जागांसाठी सुमारे ३९२ इच्छुकांनी,तर जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी तब्बल ३२० असे एकूण ७१२ इच्छुकांनी इच्छुक अर्ज भाजपा कार्यालयात दाखल केले आहेत.पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक असले तरी उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही अशी माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिलीय.

सोलपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार;

महानगर पालिका निवडणुकीत मोठा धक्का बसल्या नंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि चार आमदारांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन

भाजप नेते राज के. पुरोहित यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका बॅलेटवर घ्या - काँग्रेस नेते नाना

राज्यात पार पडलेल्या 29 नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाचा गौडबंगाल बाहेर आलं. अनेक ठिकाणी मतदारसंघ मतदारांचे वेळेवर बदलल्याने मतदान करण्याच्या दिवशी धांदल उडाली त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागला. मतदारांच्या बोटाला लावलेली शाही निघाली आणि अनेक ठिकाणी दुबार मतदारही झालं अशा अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्या. Vvpat नसल्याने मतदारांना त्यांचं मतदान कुणाला होतंय याची माहिती मिळाली नाही यासह अनेक बाबी या निवडणुकीत समोर आल्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवरच घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

असली पिक्चर अभी बाकी है - भाजप बंडखोर

अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहूमतसाठी 41 चा आकडं गाठणं महत्वाचं आहेय. त्यामुळे सत्तेच्या चाब्या दोन अपक्ष आणि शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेय. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेयेत. पवित्रकार यांनी 'साम'शी बोलतांना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय. 'ये तो बस झाँकी है, असली पिक्चर अभी बाकी है' म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेयेत. पवित्रकार हे भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे पुतणे आहेय.

आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी सह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस.

सन २०२४ च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या भाषणात, जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत, अशा मतदारांवर “रामबाण उपाय” करण्याची भाषा वापरून गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

भंडारा गोंदियाचे खासदार यांनी घेतला कबड्डीचा आनंद

भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथे जलसा निमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांना क्रीडा मंडळ यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते, उद्घाटनाच्या वेळी खासदारांना कबड्डीचा मोह आवरलं नाही त्यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डीच्या आनंद घेतला आणि खेळाडूंच्या उत्साह वाढवला.

बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले बुडणाऱ्या महिलेचे प्राण

घरच्या वादातून खडकवासला धरणात खोल पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेचे प्राण येथील धरणाची सुरक्षा व्यवस्था पाहणारे बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले. महिला पाण्यात बुडत असताना क्षणाचाही विलंब न करता हरिदास पुंडलिक वऱ्हाड यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली व तिला बाहेर काढले. नंतर पोलिसांच्या मदतीने तिला पतीच्या स्वाधीन करण्यात आले. हरिदास यांच्या तत्परतेने प्राण वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समीतीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी

धाराशिवच्या उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची चांगलीच गर्दी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा तालुक्यातून इच्छुक असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत निवडणूक तयारी,पक्ष संघटन बळकटी,बूथनिहाय नियोजन, उमेदवार निवड प्रक्रिया तसेच कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीत यश मिळवण्याचा संकल्प करण्यात आलाय.

सोलापूर महापालिकेत भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी

सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ म्हणत आमदार सुभाष देशमुखावर निशाणा?

सोलापूर महापालिकेत जागा वाटपाच्या मुद्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते

दोघांनीही बंडाची भाषा देखील केली होती मात्र विजयकुमार देशमुख हे नंतर प्रचारात सहभागी देखील झाले

मात्र आमदार सुभाष देशमूख हे मात्र शेवटपर्यंत नाराज राहिले,प्रचारात आणि विजयी जल्लोशात देखील सहभागी झाले नाही

आज शहरात ठिकठिकाणी ‘’सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली,पार्टी जिंकली‘’ या आशयचे बॅनर लागलेले पाहायला मिळतायत.

वाळू माफियांचा कारनामा,महामार्ग पोलिसांना मनस्ताप

हिंगोलीत वाळू माफियांनी हौदोस घातला आहे, महसूल प्रशासन व पोलिसांच्या पथकाला पाहून भरधाव वेगात धावणाऱ्या डंपर चालकाने राज्य महामार्गावर डंपर हायड्रोलिक करत वाळू सांडून पळ काढला आहे रस्त्यावर वाळू पसरल्याने अनेक दुचाकी चालकांचे अपघात घडले आहेत दरम्यान राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्वतः स्थानिक नागरिकांना सोबत घेत रस्त्यावर सांडलेली ही वाळू बाजूला केली आहे हा सगळा गंभीर प्रकार हिंगोली औंढा मार्गावरील बोरजा फाटा येथे घडला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात वाळू माफिया किती सक्रिय आहेत हे देखील पुढे आले आहे.

थोडक्यात पराभूत झालेले 14 भाजपचे उमेदवारांना योग्य संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा विचार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडक्यात मतांनी भाजपाचे पराभूत झालेले 14 उमेदवार यांचं योग्य सन्मान भाजपात केला जाईल तसेच त्यांची मन धरणी भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे

त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांना योग्य ती भाजपात सन्मान दिला जाईल अशी भूमिका संदीप नाईक यांनी व्यक्त केली

शिंदे गटाचे नवी मुंबई महानगरपालिकेत पराभूत झाले उमेदवारांची मनधरणी खासदार नरेश मस्के शिवसेनेकडून

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे शिंदेंचे काही उमेदवार पडले असून तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे या ठिकाणी खासदार नरेश मस्के पराभूत झालेले उमेदवारांना भेटून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांनी केला आहे योग्य वेळेला त्यांचा पुनर्वसन केला जाईल असे शब्द नरेश मस्केनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहे .

दररोज दहा जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा पहा धक्कादायक आकडेवारी

हिंगोली जिल्ह्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळाली आहे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दररोज आठ ते दहा रुग्ण कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे, लहान चिमुकले शाळकरी विद्यार्थिनी आणि जेष्ठ नागरिकांना हे भटके कुत्रे लक्ष करत आहेत दरम्यान हिंगोली पालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर आता हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे विशेष म्हणजे ही भटकी कुत्री जमिनीवर बसलेली असताना अचानक हल्ला करत असल्याचे देखील पुढे आले आहे त्यामुळे रस्त्याने प्रवास करणारे नागरिक जीव मोठे धरून ये जा करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेश नाईक यांना फोन

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे तसेच नवी मुंबई शहरामध्ये आता भाजपचा महापौर होत आहे त्यामुळे भाजपला नवी मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे या सर्व गोष्टीचा श्रेय राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना जात आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांचा फोन करून अभिनंदन केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com