
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) यांच्या पाच दिवसांच्या उपोषण आणि आंदोलनाला अखेर यश आलं. मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावे, यासाठी त्यांनी ‘चलो मुंबई’ आंदोलन छेडलं होतं. सरकारनं जीआर काढल्यानंतर मराठा बांधवांत आनंदाचं वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे ओबीसी वर्ग आक्रमक झाल्याचंही दिसून आलं आहे. सध्या जरांगे पाटील रूग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली.
पत्रकारांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांना पुढील भूमिकेबाबत विचारलं. जरांगे पाटील म्हणाले, 'आता मराठवाडा आणि पश्चिम दौरा होणार नाही. आता आम्ही बांधव खुश झालो आहोत. आम्ही जवळपास लढाई जिंकली. आम्ही आरक्षण मिळवलंय. जीआर निघाला म्हणजे लहान गोष्ट निघाली नाही', असं जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना आवाहन केलं, 'मी महाराष्ट्रातील गरीब मराठा लोकांना सांगतो की, मला भेटण्यासाठी कुणीही हार, पुष्पगुष्य, शाल असे वस्तू आणू नये. हार किंवा शालीवर खर्च करू नका. त्याजागी आपल्या पैशांच्या वापर गरिबांसाठी करा. गरिबांची मदत करा. भेटल्यानंतर मला घरातील कुंकू लावले तरी चालेल', असं जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांनी यावेळी सरकारचं कौतुक तसंच इशाराही दिला. 'कुणी बॅनर लावा, कुणी कॅम्पियन करा, आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या', असं जरांगे पाटील म्हणाले. 'तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारनं वेळेत काम केल्यास आम्ही त्यांचं कौतुकच करू. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ', असंही जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.