Manoj Jarange Patil :...तर कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा रोख कुणाकडे?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिलाय.
...तर कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा रोख कुणाकडे?
Manoj Jarange PatilSaam tv

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणारवरून सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यासाठी जीव जाळतोय, आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

आज जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, 'आमची लेकरे मोठी झाली पाहिजे. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जाीव जाळतोय. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करत आहे. आम्हाला दुसरे काही अपेक्षित नाही'.

...तर कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा रोख कुणाकडे?
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रिमंडळावरून संजय राऊतांनी CM शिंदे, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...

खासदार कल्याण काळे यांच्या भेटीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. उपोषणाच्या काळात मागण्या पूर्ण करा. त्यानंतर आमचा रोष परवडणारा नाही'.

...तर कुणालाही सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा रोख कुणाकडे?
Maharashtra Politics: ब्रेकिंग! 'शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार', काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा!

'आम्हाला मेरपर्यंत आरक्षणाची अपेक्ष सरकारकडून राहील. आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. सरकार आमच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली आहे. विधानसभा निवडणुकीत जास्त फजिती होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com