Maratha Aarakshan: जो आपल्या बाजूने बोलणार नाही तो आपला विरोधक; जरांगे पाटलांचा आमदारांना इशारा

Manoj Jarange Patil: उद्या राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार आहे. सरकार आरक्षण देण्याविषयी सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांनी सुरुवातीपासून सगेसोयरेचा विषय लावून धरावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Tv

Manoj jarange-Patil On Maratha Aarakshan Special Assembly Session:

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान उद्या अधिवेशनात आमदारांनी मराठा समाजाची जी मागणी आहे, त्याची मागणी करावी. जर तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने बोलणार नाही तर तुम्ही समाजाचे विरोधक समजल्या जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.(Latest News)

सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मीडिया आपला बांधव हाच आमचा फोन आहे. तुमच्याच माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतो, आता कोणाला लक्षात नाही राहील तर उद्या सकाळी पुन्हा आठवण करून देत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. माननीय राज्य सरकार आणि शिंदे साहेब, फडणवीस साहेब सगळे मंत्री यांना विनंती आहे की, पहिल्या सत्रात सगे सोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी, ही मराठा समाजाच्या वतीने विनंती असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अधिवेशन सुरू झाल्यापासून आमदारांनी मराठा समाजाची मागणी लावून धरावी. सकाळी अधिवेशनात सगेसोयरे बाबत चर्चा करावी. पहिल्यांदाच तो विषय चर्चेला घ्यावं. सगेसोयरे यांना लाभ मिळावे त्यासाठीच आंदोलन सुरू आहे, त्यामुळे हाच विषय लावून धरावा असं जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी हे आंदोलन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिसूचनेच्या अंमलबजावणी करावी.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय घ्यावा ही विनंती आहे. सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांनी हा विषय लावून धरावा. ही सरकार आणि सगळ्या आमदारांना समाजाच्या वतीने विनंती आहे. सुरुवातीला सगे सोयरे विषय पटलावर घ्यावा मग अंमलबजावणी झाल्यावर तो वेगळ्या प्रवर्गाच्या विषय घ्यावा असं म्हणत जरांगे पाटील यांनी आमदारांना इशारा देखील दिलाय. आमदारांनी वेगळी मागणी न करता मराठा समजाची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं ही विनंती, अन्यथा तुम्ही मराठा विरोधी आहेत हे लक्षात येईल.

आपली लेकरं स्वतःच्या हाताने मारण आता बंद करा. आपलं दैवत मराठा समाज आहे. पिढ्या पार आमच्या बाप जाद्यांनी तुम्हाला मोठं केलं. तुम्हाला ऐश्वर्य कोणामुळे आहे? गोर गरीब माराठ्यांमुळे आहे ना? तुम्ही काय त्या एकट्या येडपट येवल्यात आहे. त्याच्यामुळे (भुजबळ) मुळे मोठे झालात का? असं म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांना टोला मारलाय.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : 'विशेष अधिवेशनात सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट केली नाहीतर...', मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com