अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली. हिंगोलीच्या रामलीला मैदानावरील या महासभेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर यांच्यासह राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांची उपस्थिती होती. सभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते म्हणत जरांगेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टिकेला जरांगे पाटील यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील?
हिंगोलीच्या सभेत बोलताना छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जेवढे केस पिकले, तेवढे आंदोलने केली.. अशा शब्दात जरांगेवर टीका केली. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी "केस काळी झाली किंवा पांढरी झाली त्यांनी होत, त्याचा फायदा काय? एका संविधानिक पदावर बसायचं आणि बोलायचं त्यांच्या केसानी काय होतं? असा टोला लगावला आहे.
"बीडमध्ये त्यांच्या पाहुण्याने जाळपोळ केली. त्यांना माहित आहे. मराठ्याने तुम्हाला मोठ्या पदावर बसवले ते आतापर्यंत जुळवले म्हणूनच. अंतरावलीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळी कुणी अश्रू पुसायला का आले नाही. हे असे पांढरे झाले का तुम्ही? सरकारच्या पदावर बसला आहात असे सल्ले द्यायचे गरज काय?" असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे यांच्यावर गाव बंदी च्या विषयावर बोलताय. नारायण कुचे रोज आमच्या समोर फिरतो त्याला विचारा. तुमच्या जातीचा आहे म्हणून बोलता का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला. तसेच गावबंदी नेत्यांनी स्वतः केल्याचेही ते म्हणाले. त्यांना बीडला जायला वेळ आहे. अंतरावलीतील महिला त्यांना दिसल्या नाहीत का? इथे आई बहीण नाही का?" अशी टीकाही जरांगेंनी यावेळी केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.