Manoj Jarange Patil: बीडमधून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी केली मोठी घोषणा

Manoj Jarange Patil On Election : बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीत ९२ मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व असल्याचं जरांगे-पाटील म्हणालेत.
Manoj Jarange Patil: बीडमधून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी केली  मोठी घोषणा

(विनोद जिरे, बीड)

Manoj Jarange Patil In Beed Talk On Vidhan Sabha Election :

सरकारने आरक्षण दिलं तर ठीक नाहीतर पुढील विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. सरकारवर टीका करताना जरांगे-पाटील यांनी मराठा बांधवांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने आरक्षण दिलं तर आपल्याला निवडणुकीसंदर्भात काहीच देणं घेणं नाहीये, असं जरांगे पाटील बीडमधील जाहीर सभेत बोलत होते. (Latest News)

ही निवडणूक समुद्रासारखी आहे, ती आपली टप्प्यात आहे. सगळ्यांनी मतदान करा. त्यांना बटन सापडलं नाही पाहिजे. जवळपास ९२ मतदारसंघावर मराठ्यांचे वर्चस्व आहे. सगळ्या जाती धर्मांचे उमेदवार एकत्र आहेत , तर १६० उमेदवार आपलेच आहेत. जर आरक्षण दिल तर आपल्याला निवडणुकीचे काही देणेघेणे नाही पण दिल नाही तर तयारीला लागा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

नेत्याचा जीव मतदारांमध्ये आणि निवडणुकीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवा. आधी आपल्याला आधी राजकारण कळत नव्हतं. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकारण कळू लागलं. आता सर्व समाज आपले आहेत. त्यामुळे यांना या निवडणुकीत धडा शिकवा. नाहीतर यांनी सरळ सगेसोयरे याचा समावेश कायद्यात करावा, नाहीतर त्यांचे नुकसान होईल. आपल्याला राजकरणाशी काहीही संबंध नाही.

पण सरकार मागणी पूर्ण करत नसेल तर राजकारणात यावे लागेल. आता आपण सहा महिने बांधील आहोत. जर सरकारने आरक्षण दिलं तर काही हरकत नाही. यावेळी मराठ्यांनी १०० टक्के मतदान केलं पाहिजे. ईव्हीएम मशीनचं बटन खाली गेले पाहिजे इतक्या प्रमाणात मतदान करा असं आवाहन पाटील यांनी केले.

सगेसोयरेची नोंदी ओबीसी प्रमाणपत्रात सापडल्या आहेत. ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जुनीच आहे. ओबीसीतून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी अधिसूचना जारी करावी लागते. त्यासाठी कायदा करणं आवश्यक असतं. परंतु ओबीसीतून आरक्षण देण्याची इच्छा सरकारची नाहीये. त्यामुळे सरकारने ओबीसीसंदर्भातील अधिसूचना जारी केली नाहीये.

कायद्यासाठी अधिसूचनेसाठी करणं आवश्यक असतं.परंतु सरकारने अधिसूचना काढलीच नाही. यासाठी मुंबईत मराठ्यांना आंदोलन करावे लागल्याचं जरांगे-पाटील म्हणालेत. मुंबईत आंदोलन केल्यामुळे अधिसूचना काढण्यात आली, ही अधिसूचना कायद्यात बदल करणारी आहे. अधिसूचना जारी केल्यामुळे मराठा समाज ओबीसीत जाण्यास मोकळे झाले. आता याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला पुन्हा आंदोलन उभारायचे आहे. जर आता आपण शांत राहिलो तर आपली मागणी पूर्ण होणार नसल्याचं जरांगे यावेळी म्हणाले.

Manoj Jarange Patil: बीडमधून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी केली  मोठी घोषणा
Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com