
मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपी निर्दोष सुटले.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या.
कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
१७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला.
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व सातही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावध्ये ही बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. आज १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींना कोर्टाने निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणात निर्दोष सुटलेले सातही आरोपी कोण होते? ते आपण जाणून घेणार आहोत...
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या सातही आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर होती. या दुचाकीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणला होता असा आरोप त्यांच्यावर होता.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे देखील आरोपी होते. या बॉम्बस्फोटात ते मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होता. बॉम्ब बनवण्यासाठी त्यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होते. अभिनव भारत या संघटनेचे ते सदस्य आहेत. त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये अजय राहिलकर हे देखील आरोपी होते. अजय राहिरकर हे अभिनव भारत संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी बॉम्बस्फोटाच्या कटासाठी आर्थिक मदत गोळा करून पुरवल्याचा आरोप होता.
सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे हे देखील या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होते. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये त्यांचा देखील सहभाग होता असा आरोप होता. धार्मिक विचारधारेच्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचे आणि मानसिक पाठिंबा देण्याचे काम त्यांनी केले होते असा आरोप त्यांच्यावर होता.
सुधाकर चतुर्वेदी यांचा बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींमध्ये सहभाग होता. या बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी झालेल्या बैठकांमध्ये ते देखील सहभागी झाले होते असा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्यावर घरीच बॉम्ब बनवल्याचा आरोप करण्यात आला होता.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींमध्ये समीर कुलकर्णी यांचा देखील सहभाग होता. त्यांच्यावर बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.