Eknath Shinde: औरंगजेबाच्या कबरीवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वपूर्ण विधान, नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde statement: सध्या देशात आणि राज्यात औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून मोठा वाद सुरू आहे. हे प्रकरण इतकं तापलं आहे की काही जणांनी तर थेट औरंगजेबाची कबर उघडून फेकण्याची मागणी केली आहे. यावरच एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
eknath shinde
eknath shinde Saam Tv
Published On

सध्या देशात आणि राज्यात औरंगजेब आणि त्याच्या कबरीवरून मोठा वाद सुरू आहे. हे प्रकरण इतकं तापलं आहे की काही जणांनी तर थेट औरंगजेबाची कबर उघडून फेकण्याची मागणी केली आहे. काल देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा इशारा दिला तसेच बाबरीची पुनरावृत्ती होईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला होता.

eknath shinde
Nashik News : आमदाराचा त्रास; महिला काँग्रेस तालुका अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न, चिठ्ठीत लिहिलं...

आता यानंतरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर महत्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याने क्रूर अमानुषपणे असा अत्याचार केला. छावा सिनेमा आपण पाहिला आणि संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर संभाजी महाराजांचा शौर्य आणि औरंगजेबाचा कौर्य या कौर्याची जी काही परिसीमा त्यांनी गाठली होती. त्यामुळे अशा औरंग्याची निशाणी किंवा आठवणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे? असा सनसनीत सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

eknath shinde
Sunita Williams: अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, VIDEO

या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्ष आणि ते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, जो औरंगजेब स्वराज्यावर चालून आला त्याची कबर इथेच बनली हा इतिहास जगाला कळायला पाहिजे. आम्ही कोणाच्याही विरोधात जाणार नाही. मात्र हे सरकार बजरंगदलाच आहे. कोरटकरांच्या विरोधात बजरंग दल आंदोलन का करत नाही? अबू आझमी, सोलापूरकर यांच्या विरोधात बजरंग दल आंदोलन का करत नाही? असा सवाल यावेळी दानवे यांनी उपस्थित केला होता.

eknath shinde
Shocking News: प्रेमाचा असाही अंत! वहिनी दीराच्या प्रेमात अखंड बुडाली, पण शेवटी विष प्राशन करून..

मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, बजरंग दलाचा हा स्वतःचा निर्णय आहे. याबद्दल आमचे सरकार विचार करेल. यावर निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहे जो निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभे राहू असा गुलाबराव पाटील यांनी काल म्हटलं होतं.

दरम्यान काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी देखील यावर मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, हा चर्चा करण्यासारखा विषय नाही निवडणूक जवळ आला की कोणाला कबर दिसते.तर कोणाला प्रभू श्री रामचंद्र दिसतात. आम्ही सर्व धर्म समभावाले आहोत. त्यामुळे आम्ही त्याच्यावर न बोललेलं बरं मात्र हे सगळे मुद्दे निवडणुकीपुरते आणि राजकारण पुरते मराठीत असतात. इतके दिवस कबर इथे होती तोपर्यंत कोणाला काही वाटलं नाही. आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आल्या आहेत. तर कबरीचा विषय सुरू झाला आहे असा टोला कल्याण काळे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com