
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी एकतर्फी निर्णय घेत शिवराज राक्षेला पराभूत ठरवल्याने संतापलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली होती. त्यानंतर राक्षेला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. तर शिवीगाळ करणाऱ्या आणि चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई करण्याची मागणी राक्षेनं केलीय. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांनी पंचांना गोळ्या घालायला हव्या, अशी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
- महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोहोळ विरुद्ध राक्षे आमने-सामने
- 44 व्या सेकंदाला मोहोळने राक्षेवर मानेची ढाक डाव टाकला
- ढाक डावाने राक्षे खाली पडला आणि 48 व्या सेकंदाला मोहोळला विजयी घोषित केलं
- आंतरराष्ट्रीय नियमानुसार दोन्ही खांदे न टेकल्याने राक्षेचा निकालावर आक्षेप
- पंचांनी आक्षेप फेटाळला आणि राक्षेने पंचांना लाथ मारली
आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून राक्षेने पंचांना लाथ मारल्यामुळे त्याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. मात्र राक्षेच्या निलंबनाचा निषेध करत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू काका पवारांनी तर थेट महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आणि त्यातील सर्टिफिकेट बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय.
महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती स्पर्धा मानली जाते..या स्पर्धेवरही मॅच फिक्सिंगचा आरोप होतोय. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे केवळ राक्षेवर अन्याय झाला नाही तर इतर मल्लांचंही मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. तसंच या पक्षपातामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा बदनाम होत असून या स्पर्धेचं पावित्र्य राखण्यासाठी सर्व दोषींवर कारवाई होण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.