तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यानंतर नारायण राणे यांच्या दोन्ही सूपुत्रांनी जोरदार जल्लोष केला. मात्र या विजयानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय.त्यामुळे कोकणात निकालानंतर महायुतीत धूसफूस पाहायला मिळतेय.
उदय सामंत 4 टर्म रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले.
सामंतांच्या रत्नागिरीवर राणेंचा दावा
1990 ते 2004पर्यंत रत्नागिरीवर भाजपचं वर्चस्व होतं.
2004 विधानसभा - 63233 मतं - राष्ट्रवादी काँग्रेस
2009 विधानसभा - 74245 मतं - राष्ट्रवादी काँग्रेस
2014 विधानसभा -93876 मतं - शिवसेना
2019 विधानसभा - 118484 मतं - शिवसेना
रत्नागिरीचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी हट्ट धरला होता. मात्र त्यांना डावलून नारायण राणेंना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र रत्नागिरीतून राणेंना आघाडी मिळालेली नाही. त्यामुळेच की काय निलेश राणेंनी आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्य़ामुऴे आगामी काळात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.