वाघूर धरणाचे प्रथमच उघडले सर्व वीस दरवाजे; ४९ हजार क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग

वाघूर धरणाचे प्रथमच उघडले सर्व वीस दरवाजे; ४९ हजार क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग
वाघूर धरण
वाघूर धरण

जळगाव : जिल्‍ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मध्‍यंतरी दोन– तीन दिवस विश्रांती घेतलेल्‍या पावसाने पुन्‍हा हजेरी लावली. महिनाभरापासूनच्‍या पावसामुळे वाघूर नदीला पुर आला होता. यातच दमदार पावसामुळे वाघूर धरणातील पाण्याची पातळी वाढल्‍याने आज सकाळी धरणाचे सर्व वीस दरवाजे उघडण्यात आले. यामुळे धरणातून ४९ हजार ६१८ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

सुरवातीला कमी पावसानंतर महिनाभरापासून सुरू असलेल्‍या सततच्‍या पावसाने वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे आज (ता.२८) सकाळी सातला धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाघूर धरण
चाळीसगाव पुन्‍हा पुराच्‍या पाण्यात; महिनाभरात चौथा पुर

नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणात आणखी पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या ४९ हजार ६१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com