Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather News : महाराष्ट्रासाठी पुढील ३ दिवस महत्त्वाचे! २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट
Maharashtra Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात तापमान ४० अंशांपार

  • २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

  • अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस

  • शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच आता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह, वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यतः या काळात शेत पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज कोकण, विदर्भ, मराठ वाड्यात तापमान ४० अंश पार गेले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट
Mango : आंबा प्रेमींसाठी खुशखबर! अक्षय्य तृतीयेपूर्वी हापूसच्या दरात घसरण, किती आहे डझनाचा भाव?

२० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत असून, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. मात्र २२ तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट
Mumbai : रात्री चोरी, दिवसा फळ विक्री; मुंबईत फळ विक्रेत्याचा काळा धंदा उघड

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन

  • शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत

  • काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत

  • वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी

  • शेतमाल, भाजीपाला व इतर काढणी केलेले उत्पादन मोकळ्यावर ठेवू नये.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट
Shocking : सरकारच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबासह शिंदेला अटक

यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा अलर्ट

हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा यवतमाळ जिल्ह्याला दिला आहे. मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. जिल्ह्याचा पारा ४३ अंशावर पोहोचला असून रात्रीचे तापमान हे ३० अंशावर आले आहे, त्यामुळे दिवसाप्रमाणे रात्रीही उकाडा कायम आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये उष्णता अधिक जाणवत आहे. पुढील काही आठवडे तापमान वाढणार असल्याने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com