Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam Tv

Gram Panchayat Election: राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींची निवडणूक; कुठे, किती टक्के झालं मतदान? कधी लागेल निकाल?

Gram Panchayat Election: आज २ हजार ३५९ ग्राम पंचायतींसाठी मतदान झालं. काही ठिकाणी मतदान शांतेत पार पडलं तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं.
Published on

Gram Panchayat Election:

आज राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे कोणत्या राजकीय पक्षाकडे किती ग्रामपंचायती जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवता राजकीय पुढाऱ्यांसाठी ग्रामपंचायतची निवडणूक ही महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे गावगाड्यावर आपलेच वर्चस्व राहावे म्हणून राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. (Latest News)

दरम्यान सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी मतदान सुरू झालं. काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं. परंतु या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतल्याचं दिसून आलं. हाती आलेल्या माहितीनुसार, मावळमधील १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत ७७ टक्के मतदान झालं. पालघरमधील ग्रामपंचायतीसाठी झालेलं मतदान सकाळी साडेसात वाजेपासून साडेतीन वाजेपर्यंत ६०.६० टक्के झालं. तर नाशिकमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ७२.३४ टक्के मतदान झालं. येथील पोटनिवडणुकीच्या ठिकाणी ६९.७० टक्के मतदान झालं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान

रत्नागिरीमधील १६ ग्रामपंचायतींसाठी दुपारपर्यंत ४८. १० टक्के मतदान झालं. यात ६ ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूक झाली. तर १० ठिकाणी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक झाल्या. येथील ७ ठिकाणी थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

उमेदवारावर हल्ला

नाशिकामधील इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना धारगाव येथे घडली. रंजन गोर्धने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रंजन हे रस्तात उभे असताना अचानक टोळक्याने त्यांच्या हल्ला केला होता.

अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत मतदान

अहमदनगर जिल्ह्यात १७२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले मतदान संध्याकाळी चार वाजेपर्यंत ७० टक्के झालं. आकडेवारी पाहता मतदारांनी मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com