अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात विमान कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय...ज्या व्हिएसआर कंपनीच्या विमानातून दादांनी प्रवास केला... त्याच व्हीएसआर कंपनीच्या चार विमानांवर बंदी घालण्यात आली..या बंदीनंतर शिंदेसेनेतील आमदारांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केलीय... दादांच्या मृत्यूनंतर शिंदेंनी विमान प्रवासाचा धसका घेत काय निर्णय घेतलाय...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून विमान प्रवासाचा सर्वाधिक वापर
सुरक्षेसाठी मंत्र्यांकडून शिंदेंना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास न करण्याची विनंती
शिंदेसेनेचे नेते, मंत्री VSR कंपनीचं विमान वापरणार नाही
शिंदेंनीही आमदाराची विनंती एकून निर्णयाला मान्यता दिल्याची चर्चा
दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही.. तोपर्यंत सुरक्षेच्या कारणामुळे व्हीएसआर कंपनीची सेवा नाकारण्यावर शिंदेसेना ठाम आहे..या निर्णयामुळे दादांच्या विमान अपघाताबाबतचा संशय बळावत असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीने व्यक्त केलीय..
शिंदेसेनेच्या या निर्णयामुळे डीजीसीए आणि इतर तपास यंत्रणांवर तपासासाठी दबाव वाढणार आहे... अशा अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिंदेसेनेनं उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जातयं...आता सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर पक्षही अंमलात आणणार का? VSR वरील अघोषित बंदी अधिकृतरित्याही ाहीर केली जाणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...