
धुळे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात अधिवेशनात दोन दिवसात घोषणा होणार असल्याचे (Abdul Sattar) कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यात अवकाळी नुकसान पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु अधिवेशन संपले तरी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी संदर्भात घोषणा करण्यात आली नाही. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याची भावना काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व्यक्त केली. (Live Marathi News)
काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांनी व कृषिमंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी लावला आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी २२ मार्चला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. या दौरादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी नुकसानी संदर्भात घोषणा करण्यात येईल; असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पुढील दोन दिवस शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लागून राहिले होते. परंतु अधिवेशन संपले तरी देखील कृषिमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अवकाळी नुकसानी संदर्भात कुठलीही घोषणा अधिवेशनात करण्यात आली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.