25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल; उर्वरीत 11 जिल्हे 'जैसे थे'!

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे अशा 25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजे टोपे यांनी दिली.
25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल; उर्वरीत 11 जिल्हे 'जैसे थे'!
25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल; उर्वरीत 11 जिल्हे 'जैसे थे'!Saam tv

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे अशा 25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजे टोपे यांनी आज दिली.Corona restrictions relaxed in 25 districts

आज मुख्यंत्र्यांच्याCm उपस्थितीमध्ये पार पडलेल्या टास्क फोर्सच्याTask Force Meeting बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिल्या नियमांनुसार शनिवार रविवारी संपुर्ण बंद असणारा निर्णय पण सुधारण्यात आला असून आता शनिवारी फक्त ४ पर्यंत बंद राहिल व रविवार पूर्णत: बंद राहिल असा नविन निर्णय आरोग्यमंत्र्यांनीHealth minister जाहीर केला.

तसेच बहूचर्चित लोकलLocal संदर्भातील निर्णय हा रेल्वे प्रशासनाशी बोलून त्याबाबत रेल्वेमधील प्रमुख ऑथोरिटींशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचही राजेश टोपेंनी सांगितलं आहे. तसेच २-३ दिवसांमध्ये लोकल सुरू करण्याबाबत विचार होईल मात्र तो निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री घेतील असही टोपे म्हणाले.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड या ११ जिल्हे मात्र लेव्हलlevel3 3 मध्येच ठेवण्यात येणार आहेत, या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत.तसेच स्थानिक प्रशासनाच्या सहमतीने उलट निर्बंध वाढवले जातील असा सुचक इशाराही राजेश टोपेंनी दिला.

25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथिल; उर्वरीत 11 जिल्हे 'जैसे थे'!
लातुरमध्ये कोरोना निर्बंधांत शिथिलता नाही

मृत्युदरMortality वाढण्यामागे हॉस्पिटलस् मृत्यु झालेल्या रुग्णांची नावे अपडेट करायला वेळ लावतात आणि एकदम साचलेलले सर्व नावे अपडेट करतात त्यामुळेही मृत्युदर वाढतो. आणि आपणाला वाटत मात्र सध्या तशी परिस्थिती नाही मृत्युदर कमी असल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला. तसेच लोक सर्व आजार अंगावर काढत असून ते साध्या ताप खोकल्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कोरोना पुढच्या स्टेजला जात असून त्यामुळे कोरोना मृत्युदर वाढत असल्याच वक्तव्यही आरोग्यमंत्र्यांनी केलं. किरकोळ आजारांबाबतही आपण सतर्क रहायला हवं असही ते म्हणाले तर मागे मृत्युदर 2.38 पॉइंटवर होता मात्र आता तो 1.14 पॉइंट पर्यंत आला आहे.

दुकानदारांसाठी दिलासा

दुकानं रेस्टॉरंटच्याshop restaurant वेळा वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचही राजेश टोपेंनी यावेळी सांगितलं यामुळे काही प्रमाणामध्ये हॉटेल व्यावसायीकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com