Kurla Bus Accident: चालक नशेत नव्हता, त्याला जजमेंट कळालं नाही; गिरीश महाजन यांनी सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Girish Mahajan on Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघात प्रकरण अत्यंत दुर्देवी आहे. अपघाती मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ५ लाख आणि बेस्टकडून २ लाख रूपयांची मदत केली जाईल. माजी मंत्री गिरीष महाजन यांची माहिती.
Girish Mahajan on Kurla Bus Accident
Girish Mahajan on KurlaSaam tv
Published On

कुर्ला बस अपघात प्रकरण अत्यंत दुर्देवी आहे. अपघाती मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ५ लाख आणि बेस्टकडून २ लाख रूपयांची मदत केली जाईल. तसेच चालक नशेत नसून, त्याला जजमेंट आले नसल्यामुळं हा अपघात घडला. असे भाजपचे माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले.

कुर्ला बस प्रकरण अत्यंत भयानक आहे. चालक संजय मोरे याने भरधाव वेगाने बस चालवली. ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू, तर ४३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. आरोपी संजय मोरे तसेच कंडक्टर सिद्धार्थ मोरेवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता अपघात कसे होणार नाही? सरकारने हा विषय अतिशय गांभिर्याने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

कुर्ला अपघात प्रकरणी मंत्री गिरीष महाजन यांनी भाष्य केलं आहे. 'कुर्ला बस अपघात प्रकरण अतिशय दुर्देवी घटना आहे. आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच काही जण अजूनही रूग्णालयात उपचार घेत आहेत. शासनाच्या वतीने ५ लाख तर, २ लाख रूपयांची मदत बेस्टकडून करण्यात येईल. तसेच या घटनेची दखल अत्यंत गांभिऱ्याने घेतली जाईल.' असे महाजन म्हणाले.

आरोपी चालकाबाबात पुढे म्हणतात, 'चालक नशेत नव्हता. त्याला ट्रेनिंग देण्यात आलं होतं. पण जजमेंट चुकल्यामुळे ही घटना घडली. या प्रकरणी विशेष चौकशी होईल. अपघात कसे होणार नाही याचा देखील अभ्यास करू' असंही गिरीष महाजन म्हणाले.

Girish Mahajan on Kurla Bus Accident
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर चालकाला संतप्त नागरिकांकडून मारहाण, पाहा VIDEO

मृत तसेच जखमींनाही मदत

अपघात घडला तर आम्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना मदत करतो. तसेच किरकोळ जखमी झालेल्यांचीही मदत करू. आपण त्यांना ७ लाख रूपयांची मदत केली आहे. कायद्यानुसार सगळं सुरू असतं. आमच्याकडे आल्यावर चौकशा बंद होतात हा समज चुकीचा आहे. असं म्हणत चौकशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिलं.

गेल्या आठ महिन्यात बेस्ट बसच्या धडकेत २० जणांचा मृत्यू

कुर्ला दुर्घटनेपूर्वी झालेल्या बेस्ट अपघाती मृत्यूंची चौकशी केली जाणार. याची माहिती माजी मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. तसेच गेल्या आठ महिन्यात बेस्ट बस अपघात प्रकरणात २० जणांनी आपले प्राण गमावले आहे. १७ एप्रिल २०२४ ते ९ डिसेंबर २०२४ पर्यंत २० जणांनी आपले प्राण गमावले असल्याचा आकडा त्यांनी सांगितला.

Girish Mahajan on Kurla Bus Accident
Kurla Bus Accident: बेस्ट प्रशासनाकडून प्रकरण दाबलं जातंय का? पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com