योगेश काशीद
बीड : मागील महिन्यात राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. प्रामुख्याने काढणीवर आलेला कांदा शेतातच सडून गेला होता. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे असंवेदनशील वक्तव्य केले आहे.
राज्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. साठवणुक केलेला आणि बाजारात विक्रीसाठी तयार कांदा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने कांद्याच्या साठवणुकीवर परीणाम झाला. कांद्याला ओल लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार आहे. परीणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असुन तोंडचा घास हिरावला आहे.
साडेतीन एकर कांद्याची लागवड केली होती. यात जवळपास रोपं, बि बियाणे, खत, फवारणी असा मिळून साधारण २ लाख रुपयांच्यावर खर्च झाला आहे. अवकाळी पावसाने काही कांदा शेतातच सडला, तर काढुन झाकुन ठेवलेला कांदा पाण्याखाली गेला आणि तो काळपट पडला आहे. तर काही कांद्याला कोंब फुटले आहेत. सध्या चांगल्या कांद्याला 15 रुपये पर्यंत भाव आहे. आधीच कांद्याला भाव नाही आणि आता दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे अवकाळी पाऊस ; मी जगायचं कसं...? असा सवाल शेतकरी कल्याण वाणी यांनी केला आहे.
नुकसान भरपाई मिळणार कशी?
दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळणे देखील कठीण झाली आहे. कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले नसल्याने नुकसानीची भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असंवेदनशील वक्तव्य करत एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.