मुंबई : लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांचे पैसे करत केले जाणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांच्या माहितीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
'लाडक्या बहिणीने महायुतीला तारलं....'
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. लाडक्या बहिणींना आवाहन केल्यानंतर महायुतीला भरघोस मते मिळाली. लाडक्या बहिणींच्या साथीने महायुतीला राज्यात बहुमत मिळालं. राज्यात सत्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.
योजनेमधील अपात्र महिला अर्जदारांचे पैसे परत घेतले जाणार, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मात्र, त्यावर खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अपात्र महिला अर्जदारांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तटकरे यांच्या विधानाने अपात्र महिला अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या, 'काही महिलांना आता माहिती मिळत आहेत की, त्या अपात्र आहेत. त्यामुळे काही महिला अर्ज मागे घेत आहेत. आम्ही त्यांच्या लाभाला हात लावला नाही. आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. तसेच माहिती देखील मागवलेली नाही. साडे चार हजार महिला अपात्र असल्याचे समजत आहेत. रोज हा आकडा बदलत आहेत. त्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया केलेली नाही. सरकारने एखादी योजना सुरु केली, तर त्यानुसार कामकाज चालेल. आम्ही कोणतीही पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरु केली नाही. आम्हाला काही महिलांनी अर्ज दिले आहेत. त्याचे कारणे देखील दिले आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.