Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टराची आत्महत्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

दगडफेक प्रकरणातील आरोपी, आमदारांचा स्वीय्य सहाय्यक एक महिन्यानंतर पोलिसांना शरण

एक महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय्य सहाय्यक आरोपी अरुण जोशी अखेर एक महिन्यानंतर पोलिसांना शरण आलाय.. अरुण जोशी आणि इतर काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी अरुण जोशीसह इतर तीनजण स्वतःहून कोपरगाव पोलिसांना शरण आलेत.. एक महिन्यापूर्वी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी तर पोलिस गाडीचेही नुकसान झाले होते..

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला दाट धुक्याची चादर.

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. रिमझिम पावसामुळे येथील निसर्गाची शोभा अधिकच खुलली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर आल्हाददायक आणि नयनरम्य झाला आहे.

बळीराजाचं पांढर सोन अवकाळी पावसामुळे शेतातच पडतंय काळं...

जालना जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय.या पावसाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसतोय. बळीराजाचं पांढर सोन अवकाळी पावसामुळे शेतातच काळ पडायला सुरुवात झाली आहे. जालन्यातील पिरकल्याण,सोमनाथ यासह अनेक परिसरामध्ये काल मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला.या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस शेतातच भिजला असून कापूस काळा पडायला सुरुवात झाली आहे. कापूस शेतातच भिजल्याने बळीराजाला आता हा कापूस कमी दराने बाजारात विकावा लागणार आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

जालन्यातील भोकरदन तहसील कार्यालयासमोर विविध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण...

जालन्यातील भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर अवैध दारू विक्रीविरोधात नारायण साबळे या तरुणाने आमरण उपोषण सुरू केलय.आज या तरुणाच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर तातडीने प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्याची आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीने अक्षरशः कहर केला असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे..

यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन विभागाचा दुर्लक्ष

रुग्णांची रूग्णवाहिकांकडून लूट होत असल्याचा प्रकार राजरोस पणे घडत असून या गंभीर विषयांकडे यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केल्या जात आहे.अनेक रुग्णवाहिकांकडे आरटीओचे फिटनेस नाहीये, त्या कधी बंद पडतील याचाही नेम नाही, अनेकांनी भाऊ- दादांचे नाव वापरून हा धंदा राजरोसपणे सुरू केला आहे या सगळ्या प्रकारावर मात्र उपप्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

- बलात्कार प्रकरणात २०२४ पासून हा कैदी होता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात

- कैद्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

- सिन्नरमधील एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकारात या कैद्याला झाली होती अटक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढा_अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमुखी मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या अशी एकमुखी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.. बाळासाहेब थोरात यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.. एकीकडे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र काँग्रेस पदाधिकारी स्वबळाचा नारा देत आहेत.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी होणार की एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..

हैदराबाद रोडवर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी.

सोलापूर शहरातील हैदराबाद रोड,चंदन काटा येथे भीषण अपघाताची घटना घडली. एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बार्शी तालुक्यात बस-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुणाचा मृत्यू

वैराग येथील एस.टी. बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव चौकात घडली. रणजित महादेव पाटील मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.सोलापूरवरून सव्वा सात वाजता नॉन स्टॉप एस. टी. बस बार्शीकडे निघाली होती. सदर एस.टी. बस वैराग येथील धाराशिव चौकात आली असताना वैरागकडून सोलापूरकडे विनानंबरची दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीस्वार रणजित पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याबद्दल एक भाऊ आणि वडील असा परिवार आहे. याप्रकरणी वैराग पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune : निलेश घायवळ टोळीतील सदस्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली अटक

निलेश घायवळ खंडणी प्रकरणी फरार असलेल्या तरुणाला केली अटक

अमोल उर्फ गोरख बबन बंडगर असे आरोपीचे नाव

गुन्हे शाखेने भिगवण येथे जाऊन घेतलं बंडगर याला ताब्यात

त्याच्यावर या आधी भिगवण, वालचंद नगर, बारामती पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल

पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात केली अटक

मेट्रोला दिवाळीचा 'झटका'; प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून फक्त १२ हजारांवर

दिवाळीच्या आठवड्यात पुणे मेट्रोचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.

धनत्रयोदशीपासून प्रवासी संख्या घटू लागली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त ५२,४८२ प्रवाशांनी मेट्रो वापर केला.

इतर दिवसांची सरासरी फक्त १३–१४ हजार राहिली, तर दैनंदिन प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर आली.

शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद असल्यामुळे शहरांतर्गत प्रवास कमी झाला.

यामुळे मेट्रोला मोठा आर्थिक झटका बसला. आजपासून प्रवासी संख्येत थोडी सुधारणा दिसू लागली आहे, मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे आर्थिक परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत

PUNE : सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि सोमवारी पुन्हा एकदा कामाला जाण्यासाठी नागरिकांची लगबग यामुळेच पुण्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रविवारी रात्री पुणे मुंबई एक्सप्रेस वे, बेंगलोर मुंबई महामार्ग, पुणे सोलापूर मार्ग या सारख्या अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने नागरिक पुन्हा परतू लागले.  मुंबई- बंगळूरू महामार्गांवरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.  

KOLHAPUR साखर हंगामावर 'अवकाळी'चे 'पाणी' हंगाम लांबण्याची भीती

साखर हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली असून या पावसामुळे साखर हंगाम किमान पंधरा दिवस लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. दसरा, दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी मोळी टाकून प्रारंभ केला, पण आता प्रत्यक्ष गाळपासाठी उसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, मात्र तत्पूर्वीच २० तारखेपासून कर्नाटकचा हंगाम सुरू झाला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com