

चेंबूर अमर महल उड्डाणपुलाखाली खडी मिक्सर मशीन ट्रकावरून घेऊन जात असताना या उड्डाणपूलाखाली ही गाडी अडकली आहे. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कुर्ला ते घाटकोपर मार्गपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात शेतकरी व कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत
बच्चू कडू चे चौचा चौकामध्ये फटाक्याचे आतशबाजीमध्ये शेतकऱ्यांनी केले स्वागत.
बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी बीड शहरात कँडल मार्च काढण्यात आला. फलटण येथे घडलेली ही घटना आत्महत्या नसून हत्याच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलीस,आरोग्य विभागातील अधिकारी तसेच दबाव आणणारे राजकीय पदाधिकारी आणि खासदार यांच्यावर कठोर कारवाई करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या कॅन्डल मार्च च्या माध्यमातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडूचा आंदोलनास शरद पवार गटाकडून पाठिंबा जाहीर माजी गृहमंत्री तथा जेष्ठ नेते यांनी केला पाठिंबा जाहीर
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह, शेतमालाला हमीभाव, अपंग बांधव, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलना पाठिंबा
समविचारी पक्ष आणि संघटनांनी उद्या नागपूर शहरात आयोजित केलेल्या ‘महाएल्गार आंदोलना’त सहभागी होण्याचे आवाहन
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर निर्भया यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे आणि याच मागणीला पाठिंबा देण्यासाठी उद्या वडवणी शहर कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे.
- गंगा स्नान, सूर्य प्रार्थना आणि व्रताच्या विधीसाठी उत्तर भारतीय नागरिक गोदा घाटावर
- उत्तर भारतीय नागरिकांकडून पारंपरिक पद्धतीने संध्या पूजा
- छट पूजेच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता रामकुंड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले व आगीवर नियंत्रण देखील अग्निशमन दलाने मिळवले आहे.
ही नवीनच इमारत होती यात कोणी राहायला नव्हते त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसानं भरलेली वाहनं अडवली
शाहू साखर कारखान्याकडे चाललेला ऊस रोखला
स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांचे आंदोलन
कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये आज एमआरआय, सीटी स्कॅन आणि अल्ट्रा सोनोग्राफी मशीन उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मुश्रीफ यांच्या शुभहस्ते पार पार पडलं. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांना एका छता खाली उपचार मिळण्याच्या दृष्टीने हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सीपीआर रुग्णालय अत्याधुनिक करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून आज एमआरआय मशीन, सिटीस्कॅन विभाग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आणि अत्याधुनिक ऑडिटोरियम याचं लोकार्पण आज करण्यात आलं.
नाशिकच्या येवला शहरातील गंगादरवाजा येथे नगरपालिकेची भूमिगत पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून त्यामुळे या परिसरातील नागरीकांना पिण्याचे पाणी आज मिळणार होते ते सुध्दा मिळू शकले नाही यापुढे रस्ता खोदून पुन्हा पाईप लाईन ची दुरुस्ती करावी लागणार असल्यान नागरीकांना पाणी मिळणार नाही.आधीच तीन दिवसा नंतर पाणी पुरवठा होत असतांना पाईप लाईन फुटल्याने नागरीकांच्या अडचणीत भर पडली आहे.
अशा इन्कम टॅक्स च्या नोटीस ला मी घाबरणार नाही असे वक्तव्य गडचिरोलीच्या काँग्रेस मेळावात विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे
रत्नागिरी- समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा गणपतीपुळेला फटका
गणपतीपुळ्यातील समुद्र खावळाला, गणपतीपुळे समुद्रकिनारी जोरदार वारे
किनाऱ्यावरील पर्याटकांना पोलिसांनी काढले बाहेर
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थीती
सध्या रत्नागिरीसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार वऱ्यांसाह पाऊस
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे
कोकण किनारपट्टीवर परिणाम
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता
आंदोलन अंकुश च्या वतीने आज शिरोळ तालुक्यातील आमदारांच्या घोडावत खांडसरी कारखान्यावर आज सकाळपासून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कारखान्यात येणारी वाहने शेतकऱ्यांनी पुन्हा शेताकडे परत पाठवली असून गेट बंद करून कारखान्याचा प्रवेश पूर्णतः रोखण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या कारखाना बंद आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी ऊस दर आणि विविध मागण्यांबाबत संताप व्यक्त करत कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेत एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही. पंचवीस वर्षे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात असताना देखील मराठी माणूस बाहेर फेकला गेला स्वतः अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी मराठी माणसांसाठी एकही निर्णय घेतला नाही मराठी माणसाचा हित कधीही पाहिलं नाही या यांच्या फसव्या राजकारणाला मुंबईकर कधीही साथ देणार नाही अशी प्रतिक्रिया गृहमंत्री योगेश कदम यांनी दिली असून थेट उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे
पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते पुण्यातील एस आर ए कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. SRA प्रकल्पग्रस्तांना किमान 500 स्क्वेअर फुट फ्लॅट देण्यात यावा. ट्रानजीट कॅम्प मध्ये वास्तव्यास असलेल्या एसआरए प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी SRA विकसक बिल्डर कडून चांगल्या सुविधा देण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो एस आर ए प्रकल्पग्रस्त नागरिक हातात निषेधाची फलक घेऊन सहभागी झाले होते. आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय एस आर ए प्रकल्प पूर्ण करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भर दिवसा सराफ व्यावसायिकाचे लुटमार आणि अपहरणाची धक्कादायक घटना.....
शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण गावाजवळ घडला धक्कादायक प्रकार....
शहादा शहरातील सराफ व्यावसायिक रितेश पारेख म्हसावद गावाला व्यापारासाठी जात असतानाचा प्रकार...
वाहनाचे काचा फोडत 50 किलो चांदी, सोन आणि नगद रकमेची लूट आल्याचा अंदाज...
धारदार शस्त्र चाकू आणि पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची माहिती...
कपडे काढून नग्न अवस्थेत मारहाण करून नग्न अवस्थेतच अपहरण झाल्याचा संतापजनक प्रकार...
म्हसावद पोलीस ठाण्याच्या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर झाली अपहरणाची घटना....
नातेवाईक आणि सोनार व्यावसायिकांचे शहादा पोलीस ठाण्यात ठिय्या....
अपहरण करत्या आरोपींना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा देण्याची नातेवाईकांनी केली मागणी....
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल पोलिसांचा वतीने तपास सुरू....
शहादा पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू...
सध्या परतीच्या पावसाने धूमाकूळ घालत तूफान उडविले आहे. या मध्ये शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कापलेले भात सतत शेतात पडून असल्याने भाताला मोड आले तर काही ठिकाणचे भात पाण्यात राहून कुजून गेले या शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ना आमदार आले ना खासदार आले शेवट शहापूर चे तहसीलदार परमेश्वर कासूळे यांनी स्वता शेतकऱ्यांचे शेतात जाऊन पहाणी केली
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहाव लागत आहे. तर लातूरच्या रेनापुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर पडत नसल्याने, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेनापुर तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं आहे , दरम्यान यावेळी खराब झालेले सोयाबीन तहसील कार्यालय समोर टाकण्यात आले निदर्शने करण्यात आले. तर KYC चे पोर्टल चालत नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत द्या , अशी मागणी करण्यात आली आहे
हिंगोलीच्या बसस्थानक ऐन दिवाळी सणात बस मधून प्रवास करणारे प्रवासी जखमी होत आहेत आणि याला कारण ठरले बसस्थानक परिसरात उघडी पडलेली खडी, गेल्या अनेक वर्षापासून बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे असताना हिंगोलीचे लोकप्रतिनिधी आणि परिवहन महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे दरम्यान दिवाळी सणाच्या निमित्ताने लाल परी मधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत यामध्ये जेष्ठ नागरिक महिला आणि चिमुकल्यांचा समावेश आहे मात्र बस स्थानकात प्रवास करताना अचानक बसच्या टायर खाली खडी येऊन अनेक जण जखमी होत आहेत मागील महिनाभरात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर अनेक जण जीवमुखी धरून धोकादायक स्थितीत प्रवास करत आहेत.
उल्हासनगर शहरात आज दुपार पासून पावसाची जोरदार हजेरी
परतीच्या पावसाची रोजच हजेरी
बाजारपेठेत ग्राहकांची पावसामुळे तारांबळ
मुसळधार पावसामुळे रोडवर आले पाणी
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक
वारजे पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात होता गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झाल्यानंतर बबलू सुरवसे होता फरार
गुन्हे शाखेचे पथक होतं त्याच्या मार्गावर
अखेर बबलूला सांगलीतून केली अटक
घायवळ टोळीतील एकाला कालच केली होती गुन्हे शाखेने अटक आज ही दुसरी अटक
साताऱ्याच्या फलटण मधील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय संघटना आक्रमक झाल्या असून राज्यभर आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ (मॅगमो) संघटनेकडून निषेध आंदोलन पुकारण्यात आले आहे. नाशिकमध्ये आज काळी फित बांधत वैद्यकीय अधिकारी कामकाज करत असून संघटनेकडून जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी संघटनेकडून केली जाते आहे..
गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झालं. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष असून सततचा पाऊस,वातावरणातील बदल यामुळे द्राक्ष बागांवर डावणी बुरशी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतक-यांची चिंता वाढली असुन अजुनही पाऊस होत असल्याने पुढील काळात बागांचे नुकसान होऊन यंदाचा हंगाम अडचणीचा ठरणार अशी भिती शेतकरी व्यक्त करत आहे.
नंदुरबार बस आगारात नवीन 10 इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. आगाराने एकूण 42 इलेक्ट्रिक बसेसची मागणी केली आहे. उद्घाटनानंतर आमदार डॉ. गावित यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून सुविधांची पाहणी केली आणि आगाराला शुभेच्छा दिल्या. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या इलेक्ट्रॉनिक बस मध्ये एलसीडी डिस्प्ले सीसीटीव्ही कॅमेरे या अन्य सुविधा देखील देण्यात आलेले आहेत.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता साखर उद्योगावरही दिसू लागलाय. 1 नोव्हेंबरपासून सुरू होणारा गळीत हंगाम यंदा पुन्हा दहा दिवसांनी पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे उसतोडणीचं काम ठप्प झालं असून, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने ऊस वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर साखर कारखानदारांनाही नियोजनात अडचणी येत आहेत. राज्यातील बहुतांश भागांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागानं पुढील काही दिवसांपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर गळीत हंगाम नेमका केव्हा सुरू होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे
हिंगोलीच्या पार्टी गावात 32 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दिवाळी सणात सरकारने जाहीर केलेली मदत खात्यावर पोहोचली नाही त्यामुळे लहान चिमुकल्यांना कपडे खरेदी करू न शकल्याने विष प्राशन करून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं भावाने सांगत शासकीय रुग्णालयात टाहो फोडला आहे,
नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वाहतात सुरू असतानाच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी काँग्रेस पक्षाचा हात हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासोबत 4 माजी नगराध्यक्ष,23 माजी नगरसेवक, 8 नगरसेवक,2 माजी जिल्हा परिषद सदस्य,आणि माजी पंचायत समिती सभापती,माजी पंचायत समिती सदस्य असा मोठा गट काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. उद्या 28 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या सर्वांच्या पक्षप्रवेशाने नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला ताकद मिळण्याची शक्यता आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पूर्वी काँग्रेस मध्ये होणारी ही इन्कमिंग या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उभारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .
शनिवार वाडा हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीतील संरक्षित स्मारक
त्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या नागरिकांना सामूहिक अथवा वैयक्तिक प्रार्थना, नमाज, पूजा इत्यादी धार्मिक कृती करण्यास कायद्याने परवानगी आहे का, याबाबत कृपया लेखी स्वरूपात माहिती द्यावी असे निवेदन
ठरविलेली प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना याबद्दलही माहिती उपलब्ध करून द्यावी अशी पतित पावन संघटनेची मागणी
पुरातत्त्व स्थळे या ठिकाणी भविष्यात कधीही कोणतीच घटना घडू नये यासाठी आपल्या विभागाने सतर्क व सर्व ठिकाणी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे असे निवेदन
पुण्यामधील जैन बोर्डिंग वाचविण्यासाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी सकल जैन समाज बांधवांकडून मोर्चे आंदोलन आणि दुचाकी रॅली काढण्यात येत आहे.जैन बोर्डिंग वाचावी यासाठी जैन समाज बांधव आता आक्रमक झाले आहेत.जालना शहरातल्या जैन मंदिरापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल जैन समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणाचा खरेदी व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आमचा लढा हा चालूच राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणाला चॅरिटी कमिशनर ट्रस्टमंडळी आणि राजकीय मंडळींची हात मिळवणी असून ते जबाबदार असल्याचाही जैन समाज बांधवांनी म्हटलं.
"स्टे" कायम ठेवून धर्मदाय आयुक्त हा व्यवहार रद्द करण्याचा आदेश देणार का?
पुणे विभागाच्या सह - धर्मदाय आयुक्त यांनी सदर केला आयुक्तांना अहवाल
धर्मदाय आयुक्त यांनी दिले होते सह धर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षक नेमून दिले होते सर्वेक्षणाचे आदेश
जैन मंदिरात भगवान महावीर यांचे मंदिर असल्याचे अहवालात नमूद, विश्वसनीय सूत्रांची माहिती
उद्या मुंबईत धर्मदाय आयुक्तालयात होणार सुनावणी
धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्यासमोर होणार सुनावणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाकडून पुणे येथील जमिन विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध भव्य मूक मोर्चा काढण्यात आलाय. छत्रपती संभाजी नगर शहरातील राजा बाजार जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होऊन हा मूक मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला . सकल जैन समाजाने आपल्या मागण्याचा निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केल आहे. या मोर्चामध्ये जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जमिनीचा व्यवहार रद्द न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला...
सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत दिवे घाट वाहतुकीसाठी राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरण सुरू
रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केलं आहे
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर पुण्यातील जैन बोर्डिंग मध्ये दाखल
रवींद्र धंगेकर घेणार जैन मुनी यांचे आशीर्वाद
आज पासून रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग येथे करणार होते आंदोलन
दोन दिवस याविषयी काही बोलणार नसल्याची रवींद्र धंगेकर यांची माहिती
- आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार
- सध्या आठवड्यातून चार दिवस सुरु आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवा
- मात्र आता सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने दररोज सुरू राहणार विमानसेवा
- त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना एक नोव्हेंबर पासून दररोज करता येणार सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास
- स्टार एअरलाइन्सच्या या निर्णयाचे सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेस मुळे बळ मिळणार.. बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मानले आभार.
बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेस च्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.
आत्ता पाठींबा दिला काँग्रेस पक्षाने देखील मोर्चात थेट सहभागी व्हायला पाहिजे -बच्चू कडू यांच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आवाहन
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल जैन समाजाचा मोर्चा
- पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा, या मागणीसाठी मोर्चा
- जैन बोर्डिंगची जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याने जैन समाजामध्ये रोष
- निषेध करण्यासाठी काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- नाशिकच्या अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात
परतीच्या पावसानं नवापूर तालुक्याला झोडपल...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला....
नवापूर तालुक्यातील खेकडा झामणझर परिसरात भात शेतीच प्रचंड नुकसान....
सोमवेल कुवर या शेतकऱ्यांचे तोडणीवर आलेली भात शेती पाण्यात गेली वाहून....
खेकडा झामणझर गावातील शेतकऱ्याने लावलेल्या चार ते पाच एकर भात शेतीचे प्रचंड नुकसान....
- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचे सुरूय आमरण उपोषण
- अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगा गावात गेल्या चार दिवसांपासून सुरुय अन्नत्याग उपोषण
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रतीहेक्टरी 50 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या यासह विविध मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
- जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार
- त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोट तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाकडून पुणे येथील जमिन विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध भव्य मूक मोर्चा काढण्यात येतोय . थोड्याच वेळात छत्रपती संभाजी नगर शहरातील राजा बाजार जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहेत.
17 तारखेपासून जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द व्हावा यासाठी आचार्य गुप्तीनंदी महाराजांच्या नेतृत्वाखाली बोर्डिंगमध्ये आंदोलन सुरू
जैन बोर्डिंग च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आंदोलन ठिकाणी येणार
आंदोलकांकडून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येऊन पाठिंबा देण्यासाठी विनंती
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील युती वरून भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री नितेश राणे यांना युती वरून चांगलेच फटकारले आहे.युतीचा निर्णय घेणारे नितेश राणे हे काय राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. ते एका मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात असा टोलाही राणे यांना लगावला.
कोकणात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असे विधान मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यावर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी राणे यांना उद्देशून टोला लगावला.
एक महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय्य सहाय्यक आरोपी अरुण जोशी अखेर एक महिन्यानंतर पोलिसांना शरण आलाय.. अरुण जोशी आणि इतर काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी अरुण जोशीसह इतर तीनजण स्वतःहून कोपरगाव पोलिसांना शरण आलेत.. एक महिन्यापूर्वी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी तर पोलिस गाडीचेही नुकसान झाले होते..
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. रिमझिम पावसामुळे येथील निसर्गाची शोभा अधिकच खुलली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर आल्हाददायक आणि नयनरम्य झाला आहे.
जालना जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय.या पावसाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसतोय. बळीराजाचं पांढर सोन अवकाळी पावसामुळे शेतातच काळ पडायला सुरुवात झाली आहे. जालन्यातील पिरकल्याण,सोमनाथ यासह अनेक परिसरामध्ये काल मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला.या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस शेतातच भिजला असून कापूस काळा पडायला सुरुवात झाली आहे. कापूस शेतातच भिजल्याने बळीराजाला आता हा कापूस कमी दराने बाजारात विकावा लागणार आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
जालन्यातील भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर अवैध दारू विक्रीविरोधात नारायण साबळे या तरुणाने आमरण उपोषण सुरू केलय.आज या तरुणाच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर तातडीने प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्याची आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीने अक्षरशः कहर केला असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे..
रुग्णांची रूग्णवाहिकांकडून लूट होत असल्याचा प्रकार राजरोस पणे घडत असून या गंभीर विषयांकडे यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केल्या जात आहे.अनेक रुग्णवाहिकांकडे आरटीओचे फिटनेस नाहीये, त्या कधी बंद पडतील याचाही नेम नाही, अनेकांनी भाऊ- दादांचे नाव वापरून हा धंदा राजरोसपणे सुरू केला आहे या सगळ्या प्रकारावर मात्र उपप्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे.
- बलात्कार प्रकरणात २०२४ पासून हा कैदी होता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात
- कैद्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
- सिन्नरमधील एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकारात या कैद्याला झाली होती अटक
अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या अशी एकमुखी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.. बाळासाहेब थोरात यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.. एकीकडे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र काँग्रेस पदाधिकारी स्वबळाचा नारा देत आहेत.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी होणार की एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सोलापूर शहरातील हैदराबाद रोड,चंदन काटा येथे भीषण अपघाताची घटना घडली. एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वैराग येथील एस.टी. बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव चौकात घडली. रणजित महादेव पाटील मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.सोलापूरवरून सव्वा सात वाजता नॉन स्टॉप एस. टी. बस बार्शीकडे निघाली होती. सदर एस.टी. बस वैराग येथील धाराशिव चौकात आली असताना वैरागकडून सोलापूरकडे विनानंबरची दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीस्वार रणजित पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याबद्दल एक भाऊ आणि वडील असा परिवार आहे. याप्रकरणी वैराग पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.
निलेश घायवळ खंडणी प्रकरणी फरार असलेल्या तरुणाला केली अटक
अमोल उर्फ गोरख बबन बंडगर असे आरोपीचे नाव
गुन्हे शाखेने भिगवण येथे जाऊन घेतलं बंडगर याला ताब्यात
त्याच्यावर या आधी भिगवण, वालचंद नगर, बारामती पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल
पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात केली अटक
दिवाळीच्या आठवड्यात पुणे मेट्रोचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.
धनत्रयोदशीपासून प्रवासी संख्या घटू लागली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त ५२,४८२ प्रवाशांनी मेट्रो वापर केला.
इतर दिवसांची सरासरी फक्त १३–१४ हजार राहिली, तर दैनंदिन प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर आली.
शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद असल्यामुळे शहरांतर्गत प्रवास कमी झाला.
यामुळे मेट्रोला मोठा आर्थिक झटका बसला. आजपासून प्रवासी संख्येत थोडी सुधारणा दिसू लागली आहे, मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे आर्थिक परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि सोमवारी पुन्हा एकदा कामाला जाण्यासाठी नागरिकांची लगबग यामुळेच पुण्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रविवारी रात्री पुणे मुंबई एक्सप्रेस वे, बेंगलोर मुंबई महामार्ग, पुणे सोलापूर मार्ग या सारख्या अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने नागरिक पुन्हा परतू लागले. मुंबई- बंगळूरू महामार्गांवरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
साखर हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली असून या पावसामुळे साखर हंगाम किमान पंधरा दिवस लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. दसरा, दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी मोळी टाकून प्रारंभ केला, पण आता प्रत्यक्ष गाळपासाठी उसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, मात्र तत्पूर्वीच २० तारखेपासून कर्नाटकचा हंगाम सुरू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.