Amit Shah: लोकशाहीवर बोलण्याचा राहुल गांधींना अधिकार नाहीच; इंदिरा गांधींचं नाव घेत अमित शाह यांचं जोरदार प्रत्युत्तर

Lok Sabha Election: राहुल गांधी यांना लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, कारण त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते, असं अमित शाह म्हणाले.
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah On Rahul Gandhi Saam Tv

Amit Shah On Rahul Gandhi:

''काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, कारण त्यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात लाखो लोकांना तुरुंगात टाकले होते आणि राजकीय पक्षांवर बंदी घातली होती'', असं राजस्थानमधील जोधपूर येथील भाजपच्या सभेत अमित शाह म्हणाले आहेत.

रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीची महारॅली झाली. यामध्ये विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक, निवडणूक रोखे आणि तपास यंत्रणांचा गैरवापर यासारख्या मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लबोल केला आहे. याच सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, आज देशाची लोकशाही धोक्यात आहे. केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. यावरच राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना अमित शाह असं म्हणाले आहेत.  (Maharashtra Loksabha Election 2024)

Amit Shah On Rahul Gandhi
Fact Check: लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास बँकेतून 350 रुपये कापले जातील? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या सभेवर टीका करताना अमित शाह म्हणाले आहेत की, "तुम्ही कितीही पक्ष एकत्र केलेत तरी निवडणुकीनंतर मोदी हेच पंतप्रधान होणार".

जोधपूर येथील भाजपच्या सभेत केजरीवाल यांच्यासह विरोधी नेत्यांच्या अटकेवर शाह म्हणाले, ''जो कोणी भ्रष्टाचार करेल तो तुरुंगात जाणार. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देशातील जनता तयार असून त्यांच्या पुढील कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.''  (Latest Marathi News)

Amit Shah On Rahul Gandhi
Arvind Kejriwal: केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने मागितली ॲपलची मदत, जाणून घ्या कंपनी काय म्हणाली?

दरम्यान, इंडिया आघाडीच्या दिल्लीतील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, ''लोकसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतातील तीन ते चार अब्जाधीश लोक हे प्रयत्न करत आहेत. देशाला भविष्य दिलं. स्वप्न पाहण्याचा अधिकार दिला, ते संविधान बदलण्यासाठी ही मॅच फिक्सिंग सुरु आहे. ज्या दिवशी संविधान बदललं जाईल, तेव्हा हा देश संपून जाईल. संविधान देशाच्या लोकांचा आवाज आहे. संविधानाला संपवलं जाईल, तेव्हा देश नष्ट होऊन, राज्यांचे तुकडे होतील.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com