Maharashtra Politics: विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

Prakash Ambedkar News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार, असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Prakash Ambedkar On Congress and Thackeray Group
Prakash Ambedkar On Congress and Thackeray GroupSaam Tv

Prakash Ambedkar On Congress and Thackeray Group:

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गट वेगळे लढणार, असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे विधानसभेत त्यांचं फिस्कटणार, असा दावाही त्यांनी केला आहे. आज मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी देशात भाजपचे 170 पेक्षा जागा येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Prakash Ambedkar On Congress and Thackeray Group
PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा! शहरात अवकाश उड्डाणांवर निर्बंध; पॅराग्लायडींग, ड्रोन उडवल्यास होणार कारवाई

आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे, असेही त्यांनी म्हटले.

Prakash Ambedkar On Congress and Thackeray Group
Pankaja Munde: नाशिकमधून प्रीतम मुडेंना उमेदवारी? 'त्या' विधानावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...

आंबेडकर म्हणाले की, मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.

आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com