Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde First Reaction On Lok Sabha Result: अनेक ठिकाणचे लोकसभा निवडणूक निकाल हाती आले आहेत. काही ठिकाणचे निकाल अजून येणं बाकी आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Cm Eknath ShindeSaamTv

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) अनेक मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार विजयी झाले आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्य सरकारने केलली कामं आणि मोदी सरकारने १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती या विजयामध्ये मतदारांनी दिली आहे.', असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. 'मोदी द्वेषाने पछाडलेले लोकं मोदींना तडीपार करण्याचे काम करत होते. जे तडीपाराची भाषा करत होते त्यांना जनतेने सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केले आहे.', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मी आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. मी मतदार आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप अभिनंदन करतो. कारण त्यांनी खूप मेहनत घेतली. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. धर्मवीर आनंद दीघे यांचा बालेकिल्ला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे प्रेम असलेला ठाणे जिल्हा आहे. यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतोय. सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला आबादीत ठेवला.'

Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Vishal Patil: हे सांगलीच्या काँग्रेसचे बंड; माझ्या पायलटने दिशा ठरवल्यामुळे शक्य झाले' विशाल पाटलांना विजयाचा विश्वास!

तंसच, 'ठाण्यामध्ये विकासाला जनतेने मतदान केले. राज्य सरकारने केलेले काम आणि मोदी सरकारने १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती या विजयाद्वारे मतदारांनी दिली आहे. ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. ठाकेकरांनी त्यांचे काम दाखवून दिले आहे. नरेश म्हस्के विजयी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. तसंच, नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांना देशाचे पंतप्रधान होत आहेत. शिवसेना पक्ष एनडीएचा घटकपक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे. लवकरच एनडीएचे मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदींना तडीपार करण्याचे काम करत होते. जे तडीपाराची भाषा करत होते त्यांना सत्तापासून दूर ठेवून तडीपार केले आहे. आमचा यापुढे विकासाचा अजेंडा असणार आहे. यादेशाने पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली.'

Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Pune Election 2024 Result: मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर, पुण्यात कोण आघाडीवर? वसंत मोरेंचं काय झालं?

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'राज्यात काही प्रमाणात विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. आम्ही लोकांचा गैरसमज दूर करण्यामध्ये कमी पडलो याचा नक्की विचार करू. वोट बँकेचे ज्यांनी राजकारण केले. त्यांना मी सांगतो की वोट बँकेचे राजकारण कायम टिकत नसते. ते बाबासाहेबांनाही आवडले नसते. जी लोकं आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना नक्की कळून येईल. यांचा खरा चेहरा दिसून येईल. ते राजकारण करणारे लोकं आणि आम्ही काम करणारे लोकं. त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली. कामाची पोचपावती या निवडणुकीत आम्हाला मिळाली आहे.'

Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Akola Lok Sabha Election Result: अकोल्यात कमळ फुललं! तिरंगी लढतीत अनुप धोत्रेंचा विजय, प्रकाश आंबेडकरांचा पराभव

तसंच, 'खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिला आहे. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघात विकासाचे कामं करतील. काही जागा अतिशय कमी मतांनी आमच्या गेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशिर झाला होता हे ही त्यामागचे कारण असू शकते. त्याची कारण मिमांसा आम्ही नक्की करू. त्यासोबत मघाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे यशस्वी झाले आहेत. त्याचाही विचार आम्ही करू.' असे देखील त्यांनी सांगितले. त्याचसोबत, 'देशात इंडिया आघाडीचे सरकार होऊ शकत नाही. कारण बहुमत आम्हाला मिळाले आहे. एनडीए सरकार बनत आहे. भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदींना तडीपार करायचा त्यांना जनतेने तडीपार केले आहे.', असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Maharashtra Loksabha Election Result: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Baramati Loksabha Election Result: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी, सुनेत्रा पवार यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com