When Feel Lonely : एकटेपणा जाणवेल तेव्हा हे काम करा, तणाव लगेच होईल दूर

How To Stress Free : कधीकधी उदासीनता आणि एकटेपणा जाणवणे सामान्य आहे, परंतु जेव्हा ते एक दिवस किंवा आठवडाभर चालू राहिले की मानसिक त्रास होतो.
When Feel Lonely
When Feel LonelySaam Tv
Published On

When Feel Lonely :

कधीकधी उदासीनता आणि एकटेपणा जाणवणे सामान्य आहे, परंतु जेव्हा ते एक दिवस किंवा आठवडाभर चालू राहिले की मानसिक त्रास होतो. मग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या स्थितीवर मात करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती नक्कीच असतात जिच्याशी संवाद केल्यामुळे विशेष दिलासा मिळतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा त्यांच्याशी बोला. तुमच्या समस्या त्यांच्याशी शेअर (Share) करा, तुमच्या मनाला शांती मिळेल.

- आपल्या सर्वांकडे आनंददायी आठवणी आणि अनुभवांचा असा खजिना आहे, ज्यामध्ये डुबकी मारल्याने मन आनंदी भावनांनी भरते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःखी, निराश किंवा एकटेपणा वाटत असेल तेव्हा याकडे लक्ष द्या.

- तुमचे छंद (Hobby) जोपासा. चित्रकला-फोटोग्राफी करा, संगीत ऐका, नवीन भाषा शिका, तुमचे आवडते खेळ खेळा. YouTube वर तुमची आवडणारे व्हिडिओ पाहा. तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल.

When Feel Lonely
Chanakya Niti On Stress : आयुष्यात या कारणांनी येतो मानसिक ताण अन् होते दिशाभूल, जाणून घ्या

- पेहराव केल्याने मन आनंदी भावनांनी भरते, म्हणून जेव्हा जेव्हा एकटेपणा तुम्हाला खूप त्रास देतो तेव्हा स्वतःचे लाड करा. नवीन स्टाईलने आपले केस विंचरा. तुमचे आवडते कपडे घाला.

- पुस्तके हे चांगले मित्र आहेत. हे वाचण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला एकटेपणाशी लढण्याची ताकद मिळेल.

- हसल्याने तणाव (Stress) दूर होतो आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून, स्वतः हसत राहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना मजेदार किस्से आणि विनोद सांगून हसवा.

When Feel Lonely
Stress In Kids: पालकांनो, तुमचं मुलंही तणावाचा शिकार होत आहे का? या गोष्टींवरुन मिनिटात ओळखा

- पाळीव प्राण्यांशी मैत्री करा. ते तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवू देणार नाहीत.

- मुलांसोबत वेळ घालवा. त्यांचे मजेदार बोलणे आणि हसरे चेहरे दुःख दूर करतील.

- प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, त्यामुळे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. असे केल्याने मन अधिक अस्वस्थ होऊ शकते.

- कधीतरी स्वतःशी बोला. तुमची सामर्थ्ये आणि यशाचा विचार करा. हे सकारात्मकता प्रदान करते. तणावही कमी होतो.

- काही काळानंतर आपले लक्ष्य बदलत राहा. त्यांना मिळवण्याचाही प्रयत्न करा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, अनेक वेळा आपल्याला इतर कशाचाही विचार करायला वेळ मिळत नाही. यामुळे एकटेपणाही दूर होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com