
तुम्ही आजारी पडल्यानंतर लवकर बरं वाटावं म्हणून थेट मेडिकलमधून अँटिबायोटिक घेत असाल तर सावधान...कारण अँटिबायोटिक औषधं तुमच्या मुळावर उठलेत.अँटिबायोटिकच्या अतिवापरामुळे इन्फेक्शनचा धोका वाढल्याचा टोकाचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला दिलाय..
ग्लोबल अँटिबायोटिक सर्व्हिलन्स रिपोर्टनुसार भारतात दर 3 पैकी 1 रुग्ण अँटिबायोटिक्सला प्रतिसाद देत नसल्याचं समोर आलंय.हे प्रमाण आफ्रिकी देशांपेक्षा जास्त आहे. अँटिबायोटिकच्या अतिवापरामुळे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगल आणि इतर आजारांसाठीच्या औषधांचा प्रतिरोध कमी झालाय.. तर या अँटिबायोटिकच्या अतिवापरामुळे दरवर्षी भारतात 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत.
अमेरिका आपल्या बजेटच्या 17 टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करते. मात्र भारतात केवळ जीडीपीच्या 4 टक्केही आरोग्यावर खर्च केला जात नाही. त्यामुळे कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या आपल्या देशाला आता थेट जागतिक आरोग्य संघटनेनंच अँटिबायोटिकसंदर्भात इशारा दिल्यानं आतातरी आपल्या सत्ताधाऱ्यांचे आणि नागरिकांचे डोळे उघडणार की अँटिबायोटिकचे डोसवर डोस घेऊन आपणच स्वतःची कबर खोदणार...हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.