

आपल्या बाळासाठी काय योग्य काय वाईट याची चिंता सतत पालकांना सतावत असते. अशातच त्यांची तब्बेत बिघाडली असेल तर आई- बाबांची झोपच उडालेली असते. आजारपण अंघोळीमुळे बळावतं अस काही पालकांचे म्हणणे असतं. त्यामुळे मुलाला अंघोळ घातली जात नाही किंवा त्यांच्या जेवणाच्या वेळात, जेवणात अनेक बदल केले जातात. यामागे भावना फक्त एकच असते की, आपल मूल लवकर बरं व्हावं. पण केव्हा केव्हा हे घरगुती उपाय बाळासाठी धोकादायक ठरू शकतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताप आणि अंघोळ यांचा असा काही थेट संबंध नसतो. मुलाला ताप आला असेल पण जर मूल व्यवस्थित खेळत असेल, अॅटिव्ह असेल तर कोमट गरम पाण्याने अंघोळ घालू शकता. अंघोळ केल्यावर बाळाचे शरीर स्वच्छ राहील, शिवाय त्याला ताजेतवाने देखील वाटेल. उलट अंघोळ न केल्याने मुलाला अशक्तपणा जाणवेल. बाळाला थंडी लागत असेल, खूप जास्त अशक्तपणा जाणवत असेल तर कोणतेही घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पालकांना वाटत असत की, जास्त कपडे घातले की मुलांना घाम येईल आणि ताप निघून जाईल, पण त्यात तत्थ नसतं. उलट जास्त कपडे घातल्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्यामुळे मुलांना नेहमी हलके कपडे घातले पाहिजेत.
बाळ जर सशक्त असेल व्यवस्थित जेवत असेल तर त्याला पौष्टिक अन्नच द्यावे. कारण ज्यावेळी शरीर तापाशी लढत असत त्यावेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते. अशावेळी मुलांना पोटभर आणि पौष्टिक अन्न खाऊ द्यावे.
ताप असल्यामुळे मुलांना कायम तहान लागत असते. अशावेळी डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. आहाराचा योग्य तो समतोल साधत नारळपाणी, दूध, सूप देत राहावे.
सतत झोप येणे.
श्वास घ्यायला त्रास होणे.
सतत उलटी होणे.
डिहायड्रेशनची लक्षणे दिसणे.
लघवीला कमी होणे.
तापाची अधिक लक्षणे दिसल्यास क्षणाचाही विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.