Malaria: शहरांमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ नेमकी कशामुळे? डॉक्टरांनी सांगितली संपूर्ण माहिती अन् टिप्स

Mosquito Control: शहरांमध्ये मलेरियाची वाढ पावसामुळे नाहीतर साचलेल्या पामी, अपुरी ड्रेनेज व्यवस्था आणि बांधकामामुळे होते. उष्ण हवामानामुळे डासांची वाढ वेगाने होत असते. त्याने संसर्गाचा धोका वाढतो.
Exposure in unhygienic areas increases infection risk significantly
Urban malaria rise is mainly due to stagnant water from poor infrastructure and construction sitesgoogle
Published On

शहरांमध्ये अलीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही केवळ ऋतू बदल किंवा पावसामुळे नसून प्रामुख्याने शहरी विकासाशी संबंधित समस्यांमुळे होत आहे. सामान्यतः मलेरिया हा पावसाळा किंवा पर्जन्यमानाशी जोडला जातो, मात्र सध्या दिसणारी वाढ ही मानवी क्रियाकलापांमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय परिस्थितींशी अधिक संबंधित आहे.

या वाढीमागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शहरातील विविध भागांत साचलेले अस्वच्छ व स्थिर पाणी. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून राहणे, कचरा वेळेवर न उचलणे, नाल्यांची योग्य देखभाल न होणे किंवा ड्रेनेज प्रणाली बिघडलेली असणेया सर्व गोष्टी मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या प्रजननासाठी अनुकूल ठरतात. विशेषतः झोपडपट्टी किंवा कमी विकसित भागांमध्ये साचलेले पाणी आणि चिखलयुक्त जागा समस्या अधिक वाढवतात.

Exposure in unhygienic areas increases infection risk significantly
MP Kisan Kalyan Yojana: शेतकऱ्यांना १४ वा हप्ता कधी मिळणार? लाभार्थ्यांनी आत्ताच घ्या जाणून

महत्त्वाची बाब म्हणजे, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे हवामान हा थेट कारणीभूत घटक नाही. पाऊस पडत असला तरी केवळ पावसामुळे पाणी साचत नाही; तर अपुरी पायाभूत सुविधा आणि देखभालीच्या त्रुटींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे मलेरिया वाढण्याचे खरे कारण पाऊस नसून पाणी साचून राहण्यास अनुकूल असलेली परिस्थिती आहे.

तथापि, हवामान सहाय्यक भूमिका बजावते. सध्या असलेले उष्ण आणि दमट वातावरण साचलेले पाणी लवकर आटू देत नाही. यामुळे डासांची अंडी अधिक काळ जिवंत राहतात आणि त्यांचा प्रजनन चक्र अधिक वेगाने पूर्ण होते. अशा प्रकारे हवामान हे मुख्य कारण नसले तरी परिस्थितीला पोषक ठरते.

याशिवाय, संपर्काचा (exposure) घटकही महत्त्वाचा आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, अस्वच्छ परिसरात किंवा साचलेल्या पाण्याजवळ राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना धोका अधिक असतो. अशा ठिकाणी डास चावण्याची शक्यता जास्त असल्याने मलेरियाचा प्रसार वाढतो. डॉ. दीपेश जी. अग्रवाल, Consultant Physician and Head of Critical Care Medicine at Saifee Hospital, Mumbai यांनी ही माहिती दिली आहे.

एकंदरीत, शहरांमधील मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ ही प्रामुख्याने शहरी आणि पर्यावरणीय घटकांमुळे होत आहे. विशेषतः अस्वच्छ, साचलेल्या पाण्यामुळे. हवामान हे मुख्य कारण नसून पूरक घटक आहे. त्यामुळे मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी या मूळ समस्यांवर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Exposure in unhygienic areas increases infection risk significantly
Symptoms Of Dehydration: या ५ लक्षणांवरुन ओळखा शरीराला आहे पाण्याची गरज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com