
माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याच्यामुळे इतरही प्रेरित व्हायला हवे. यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो ज्यामुळे त्याला अपयशाचा सामना करावा लागतो.
चाणक्य म्हणतात, चांगले कर्म केले तर आपल्याला वाट्याला चांगलेच येते. परंतु, आपण चुकीचे काही केले किंवा आपल्यामुळे इतरांना त्रास झाला की त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. पैसे कमावण्यासाठी बरेचदा मनुष्य वाईट संगतीचा पर्याय निवडतो त्यामुळे धनहानी तर होतेच पण येणाऱ्या संकटांचाही सामना करावा लागतो. त्यासाठी अशा माणसांना तुमच्यापासून दूर ठेवा ज्यांच्यामुळे तुमचे नुकसान होईल. जाणून घेऊया त्याबद्दल
1. लोभी व्यक्ती
चाणक्य म्हणतात लबाड व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका. कारण नेहमी तो स्वत: चा विचार करत असतो. त्याला फक्त स्वत:चा स्वार्थ साधायचा असतो. त्यामुळे वेळ आल्यावर तो आपली फसवणूकही (Fraud) करु शकतो.
2. खोट बोलणारी व्यक्ती
खोट बोलणारी व्यक्ती ही नेहमी आपल्या पैशांच्या (Money) बाबतीत फसवू शकते. ते आपल्या फायद्यासाठी कधीही खोट बोलू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून अंतर राखायला हवे.
3. स्वार्थी व्यक्ती
स्वार्थी व्यक्ती नेहमी स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असते. ही व्यक्ती फक्त त्यांच्या स्वार्थासाठी लोकांचा (People) वापर करते. अशा लोकांना लवकर ओळखायला हवे. आणि वेळीच दूर राहायला हवे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.