Shaheer Sheikh Post: 'महाभारत' मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता शहीर शेख सध्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावामुळे चिंतेत आहेत. त्याची आई आणि बहीण जम्मूमध्ये राहतात, जिथे अलीकडेच झालेल्या क्रॉस-बॉर्डर हल्ल्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. शहीरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दलची चिंता व्यक्त केली आहे.
शहीरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी आपल्या सैन्याचा सदैव ऋणी राहीन! माझी आई आणि बहीण जम्मूमध्ये आहेत... आणि या हल्ल्यांमुळे आम्हाला रात्री झोप लागली नाही. पण आपल्या सैन्याने ज्या प्रकारे जलद, अचूक आणि धैर्याने प्रत्युत्तर दिले, ते खरोखरच प्रशंसनीय आहे." त्याने पुढे लिहिले की, "सैनिकांना सलाम, त्यांच्या कुटुंबीयांनाही सलाम. युद्धभूमी आणि त्याबाहेर जे धैर्य ते दाखवतात, तेच आपल्या देशाला आणि लोकांना सुरक्षित ठेवते."
शहीर शेख जम्मूच्या भद्रवाह येथील रहिवासी आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, "मी फक्त कल्पना करू शकतो की जेव्हा एखाद्या सैनिक म्हणजेच 'आपला' माणूस सीमारेषेवर असतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था कशी असेल." त्यांनी या कठीण काळात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांसाठी संवेदना व्यक्त केल्या आणि 'जय हिंद' असा संदेश दिला.
शहीरच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. त्याच्या या भावनिक पोस्टने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. शहीर शेख 'महाभारत' व्यतिरिक्त 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'ये रिश्ते हैं प्यार के' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही झळकले आहेत. त्याने अलीकडेच कृति सेननच्या 'दो पत्ती' या चित्रपटातही भूमिका साकारली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.