Mission Raniganj song Keemti Song Released
Mission Raniganj song Keemti Song ReleasedInstagram

Keemti Song Released: ‘मिशन राणीगंज’ मधलं परिणीती- अक्षयचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज, ‘किमती’मधल्या लव्ह केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Mission Raniganj In Keemti Song Released: ‘मिशन राणीगंज’मधील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Published on

Mission Raniganj song Keemti Song Released

‘मिशन राणीगंज’मधील पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार ‘OMG 2’ नंतर या चित्रपटाच्या माध्यमातू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर चित्रपटातील ‘किमती’ हे पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Mission Raniganj song Keemti Song Released
12th Fail Trailer: IPS अधिकारी होण्याच्या जिद्दीने पछाडलेल्या तरुणांच्या संघर्षाची कहाणी, '12th Fail' चा दमदार ट्रेलर रिलीज

गाण्यामधील अक्षय आणि परिणीतीच्या रोमान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटातील ‘किमती’ या गाण्यामध्ये प्रेक्षकांना परिणीती आणि अक्षयची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. गाण्यामध्ये परिणीतीने सिंपल साडी, केसांचा बन आणि त्यावर गजरा लावलेला दिसत आहे. तर अक्षयने टीशर्ट, कोट आणि फॉर्मल पँट घातलेली दिसत आहे. त्या सोबतच अभिनेत्याने पगडीही घातल्याने त्याचा लूक खूपच आकर्षक दिसतोय. गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून प्रदर्शित होताच हे गाणं काही मिनिटात व्हायरल झालंय.

‘केसरी’नंतर ‘मिशन राणीगंज’मध्ये परिणीती आणि अक्षय एकत्र दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. विशाल मिश्राने ‘कीमाती’ हे गाणं गायलं असून कौशल किशोरने हे गाणं लिहिलं आहे. गाणं प्रदर्शित होताच अवघ्या काही मिनिटांतच हे गाणं प्रेक्षकांना फारच आवडत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘केसरी’ मधल्या ‘वे माही’ सारखाच प्रतिसाद मिळणार का?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Mission Raniganj song Keemti Song Released
Kapil Sharma New Look: कपिल शर्माच्या नवीन लूकनं वेधलं चाहत्यांचं लक्ष, नेटकऱ्यांनी कमेंट्स करत उडवली खिल्ली

परिणीती चोप्राने आणि खासदार राघव चड्ढा यांनी २४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. तिचा लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा दीपक किंगराणी आणि पूनम गिल यांची आहे. चित्रपटाची कथा पश्चिम बंगालमधील १९८९ मध्ये झालेल्या राणीगंज कोलफील्ड आपत्तीवर आधारित आहे. अक्षय कुमारने जसवंत सिंहचे पात्र साकारले असून परिणीतीने त्याच्या पत्नीचे पात्र साकारले.

Mission Raniganj song Keemti Song Released
Shraddha Kapoor Traveled Auto Rikshaw: पुन्हा एकदा श्रद्धा कपूरच्या साधेपणाचं झालं दर्शन; अभिनेत्रीने महागडी कार सोडून चक्क रिक्षातून केला प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com