Solapur Crime
Solapur CrimeSaam Tv

Solapur Crime: ...माझ्या भांगेत तू कुंकू भर; अश्विनी केशापुरेनं चिठ्ठीत लिहिली होती शेवटची इच्छा, आत्महत्येचं कारण आलं समोर

Solapur Crime: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं म्हणून अश्विनीने जीवलग मित्र आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात तिला यश आले नाही. जीवलग मित्रानं नाते तोडल्यानंतर अश्विनी नैराश्यात गेली होती.
Published on

एकाच स्कार्पनं बहीण-भावानं आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली होती. याप्रकरणाने परिसरात खळबळ माजली होती. या धक्कादायक घटनेमागचं कारण समोर आले आहे. अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार याने एकाच रुमालाने गळफास घेत आयुष्य संपवलं होतं. आत्महत्या करण्याधी अश्विनीनं एक चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांना घटनास्थळी ही चिठ्ठी मिळाली होती, या चिठ्ठीतून नवीन माहिती समोर आलीय.

आम्ही दोघेही बहीण- भाऊ आहोत, कोणताही अर्थ लावून नका अशा अशायाची चिठ्ठी अश्विनी लिहिली होती. आता त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवलग मित्रांच्या ताटातूटीमुळे अश्विनी आणि रोहितने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं पोलीस म्हणाले.

Solapur Crime
Thane Crime: मालमत्तेचा वाद टोकाला गेला, सावत्र भावाचं शीर धडावेगळं केलं अन् जंगलात गाडलं; ठाणे हादरलं

या आत्महत्येला अश्विनीची जीवलग मित्राची ताटातूट त्याचे दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेले स्नेह,नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंधाची पार्श्वभूमी आहे. मित्रांनी साथ सोडली म्हणून अश्विनी नैराश्यात होती, त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचे ठरवले. तर आधीच घरातील नातेसंबंधाची गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे रोहितनेही आयुष्य संपवलं.

Solapur Crime
Pune Crime: 'तू जा मर', चाळिशीतल्या महिलेचं २१ वर्षीय तरूणासोबत अफेअर; पतीला कळताच स्वत:लाच संपवलं, पुढे जे घडलं..

सहा मित्र होते, त्यात रोहित अन् अश्विनी एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता. तो अश्विनीचा जीवलग मित्र बनला होता. पण दीड वर्षापासून अश्विनीची तिच्या जीवलग मित्रापासून ताटातूट झाली. त्याच दरम्यान आदित्यला जीवलग मैत्रिण मिळाली. रोहितचा दुसरा मित्र राज यालाही एक मैत्रिण होती. अश्विनीला आदित्यपासूनचा दुरावा सहन होत नव्हता. यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्यासाठी प्रयत्न करत होती.

Solapur Crime
Thane Crime: मालमत्तेचा वाद टोकाला गेला, सावत्र भावाचं शीर धडावेगळं केलं अन् जंगलात गाडलं; ठाणे हादरलं

यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते झालं नाही. वारंवार मित्र मैत्रिणीमध्ये भांडणं होत होते. त्यामुळे ८ जणांनी रुपभवानी परिसरात बैठक घेतली. या बैठकीत भांडणाचे मूळ कारण अश्विनीच असल्याचं कळाले. त्यानंतर ग्रुपमधील चार जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला. त्यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध तोडून टाकले.

Solapur Crime
Thane News : विजेच्या लाईनवर झाडांच्या फांद्या, १७ वर्षीय बालकामगाराला झाडावर चढवलं; हात लावताच खाली कोसळला अन्...

यामुळे रोहित आणि अश्विनी तणावात गेले होते. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा नंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने थेट आत्महत्या करण्याचे ठरवलं. रोहित कर्णिकनगरमधील एका घरामध्ये राहत होता. तेथे अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितलं. रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली भावनिक माहिती समजली. त्यामुळे तो आणखी तणावात गेला. त्याच तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली.

...माझ्या भांगेत कुंकू भर

आत्महत्येपूर्वी अश्विनीने चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत तिने रोहित आणि आपण बहीण भाऊ आहोत असं सांगितलं होतं. त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या नात्याविषयी लिहिली होते. तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे. हे तू ओळखायला हवे होतं. यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com