
पाटणा : बिहारची राजधानी पाटणामधील बख्तियारपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहितेनं तिच्या चुलत दिरासोबत मिळून तिच्या अपंग पती धीरज कुमारची हत्या केली आहे. दोघांनाही लग्न करता यावे यासाठी या कपलने हा कट रचला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी शालूला अटक केली आहे. तर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालू आणि तिचा चुलत दिर यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्न करायचं होतं. त्यामुळे त्यांनी धीरजला म्हणजेच शालूच्या पतीला आपल्या वाटेतून हटवण्याचा निर्णय घेतला. शालूनं सांगितलं की, धीरजने नुकतीच ९ लाख रुपयांची जमीन विकली होती. शालूच्या घरातून २ लाख ४३ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात एकूण ५ जण सामील होते, यामध्ये केवळ शालूला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत शालूनं धक्कादायक खुलासा केला आहे. शालू म्हणाली की, 'ती आणि तिचा दीर एकमेकांशिवाय जगू नाही शकत'. शालू आणि तिच्या दिराचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून धीरजला पूलावर बोलावालं आणि एका कुख्ख्यात शूटरच्या मदतीने गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी धीरजचा मृतदेह नदीत फेकून दिला. प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना संशय तेव्हा आला, जेव्हा पती बेपत्ता झाल्यावर पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नव्हती.
एसडीपीओ आणि ठाण्याचे प्रभारी यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासात समोर आलं की, या गुन्ह्यात एकूण ५ जणांचा समावेश होता. विवाहितेनं दिराला जवळ करण्यासाठी पतीलाच वाटेतून दूर केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. शालूला बेड्या ठोकण्यात आल्या असून अन्य आरोपी फरार आहेत. सध्या पोलीस इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.