

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी
टोलमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय
महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यावर नवी दरवाढ लागू
सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी
महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. आता टोलमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक टोल नाक्यावर ही दरवाढ लागूदेखील झाली आहे. टोलमध्ये तीन ते पाच टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे.
टोलच्या दरात वाढ (Maharashtra Toll Price Hike)
राज्यात आजपासून महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोल दरात सरासरी ३ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएचएआय (NHAI) च्या राज्यातील सुमारे ७० आणि एमएसआरडीसी (MSRDC) च्या ३५ प्रमुख टोलनाक्यांवर ही दरवाढ लागू आहे .त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.लकार, जीप, बस आणि ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टोल महागला आहे. टोल दरात ३ ते ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
फास्टॅग अनिवार्य
टोलमध्ये दरवाढ तर केलीच आहे याचसोबत टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून केवळ फास्टॅग (FASTag) किंवा डिजिटल पेमेंटद्वारे टोल भरण्याची सक्ती आहे.सोलापूर-पुणे, पुणे-मुंबई एक्सप्रेसवे, आणि इतर प्रमुख महामार्गांवर प्रवास महागला आहे.
वाढत्या महागाईच्या काळात टोलमधील या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे. याचसोबत आता तुम्हाला फास्टॅग किंवा ऑनलाइन यूपीआयद्वारेच टोल भरावा लागणार आहे. याआधीही याबाबत नियम जारी केले होते. मात्र, आज १ एप्रिलपासून हे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत.
घराबाहेर पडताना नेहमी तुम्ही तुमचा फास्टॅग बॅलेन्स चेक करा. जर तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलेन्स नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही हे काम लगेच करा. याचसोबत टोल नाक्यावर आता क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर लगेच तुम्ही टोल भरु शकतात.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
फास्टॅग अॅक्टिव्ह आहे की नाही हे चेक करा. फास्टॅगमधील बॅलेन्स चेक करा.
फास्टॅग नसेल तर यूपीआय किंवा डिजिटल पेमेंटचा ऑप्शन तयार ठेवा. जेणेकरुन टोल नाक्यावर तुमचा जास्त वेळ वाया जाणार नाही.