

IAS अवी प्रसाद यांचा प्रेरणादायी प्रवास
तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ
IPS ते IAS होण्यापर्यंतचा प्रवास
यूपीएससी परीक्षा ही सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनत आणि सातत्यामुळेच आपल्याला यश मिळते. असेच प्रयत्न आयएएस अवि प्रसाद यांनी केले. त्यांनी यूपीएससी परीक्षा एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली. आयएएस अवि प्रसाद सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आयएएस अंकिता धाकरे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.त्या सध्या राज्य मंत्रालयात कार्यरत आहे.
IPS ते IAS पर्यंतचा प्रवास
अवि प्रसाद यांना लहानपणापासूनच घात सामाजिक जीवनाचे बाळकडू मिळत होते. त्यांनी २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. यावेळी त्यांची निवड आयपीएस म्हणून झाली. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली यावेळी त्यांची निवड आयएएस ऑफिसर म्हणून झाली.
अवि प्रसाद हे मूळचे सीतापूर जिल्ह्याचे रहिवासी आहे. त्यांचे आजोबा टम्बेश्वर प्रसाद हे माजी मंत्री होते. त्यांनी राजकारण आणि सामाजिक जीवनाचा अनुभव खूप जवळून घेतला आहे. त्यांनी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी या आयएएस अधिकारी आहेत.
अवि प्रसाद हे त्यांच्या कारकिर्दीमुळेही चर्चेत असतात. त्यांनी अनेक राज्यांमध्ये काम केले आहे. ते डेस्कवर बसून काम करण्यापेक्षा फील्डवर जाऊन काम करण्यास पसंती देतात. त्यांच्या कामामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.