चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात हा निर्णय घेण्यात येतो. यामागच कारण जंगलातील रस्त्यांची खराब अवस्था आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली शांतता हे आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे व दाट होतात, त्यामुळे पर्यटक आणि वाहनांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. तसेच वन्यजीवांचा प्रजनन काळ असल्याने त्यांना कोणताही त्रास न होता सुरक्षित वातावरण मिळावे, हाही उद्देश या बंदीमागे आहे. ही बंदी केवळ कोअर झोनमध्ये लागू राहील, तर बफर झोनमधील सफारी आणि इतर पर्यटन सुविधा पूर्ववत सुरू राहणार आहेत. वन विभागाने पर्यटकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे आणि पावसाळ्यानंतर पुन्हा कोअर क्षेत्रात प्रवेश खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.